शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

सत्ताधाऱ्यांची कारकुनी; झाला विकास ठप्प

By admin | Updated: June 21, 2017 04:33 IST

महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या कारकुनी कारभारामुळे शहरविकास ठप्प झाला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या कारकुनी कारभारामुळे शहरविकास ठप्प झाला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. शहरातील कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’ असून नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. अर्धवट असलेला अंबरनाथ-कल्याण रस्ता, मुख्य पाच रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. मनपा पाणी, कचरा उचलण्याचे बिल व कर्मचाऱ्यांचा पगार ही तीनच कामे करत असल्याचा आरोप केला.उल्हासनगर महापालिकेवर भाजप मित्र पक्षाची आघाडी सत्तेवर आली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात एकाही विकासकामाला सुरूवात झाली नसून पदासाठी त्यांच्यात भांडणे लागली आहेत. तोच प्रकार महापालिका प्रशासनाचा असून कारकुनी कारभाराचा प्रत्यय येत असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेने कोणतेही नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केलेले नाहीत. नगररचनाकार विभागाकडून येणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला असून आयुक्त नगररचनाकार विभागाबाबात ठोस भूमिका घेत नाही. सत्ताधारी भाजपाने नवीन नगररचनाकार आणून ठप्प पडलेला विभाग सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपा मित्र पक्षाच्या आघाडीपूर्वी महापालिकेवर शिवसेना-भाजपा, साई व रिपाइची सत्ता होती. मात्र सरकारने जकात व एलबीटी बंद करून त्याऐवजी ११ कोटीचे अनुदान सुरू केले. जकातीपासून पालिकेला दरमहा १३ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते. सरकारने त्या उत्पन्नाच्या प्रमाणात एलबीटी अनुदानाची मागणी सत्ताधारी भाजपाने सरकार दरबारी लावून धरण्याचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. पालिका पाणीबिल व कचरा उचलण्याच्या बिलासह कर्मचाऱ्यांचा पगार असे तीनच कामे करत आहेत. एलबीटी पोटीचे अनुदान व मालमत्ता कर वसुली असे दोनच उत्पन्नाचे स्त्रोत पालिकेकडे आहेत. निधीचे कारण पुढे केल्याने शहरातील विकासकामे ठप्प पडली आहेत.