शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

सत्ताधाऱ्यांची कारकुनी; झाला विकास ठप्प

By admin | Updated: June 21, 2017 04:33 IST

महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या कारकुनी कारभारामुळे शहरविकास ठप्प झाला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या कारकुनी कारभारामुळे शहरविकास ठप्प झाला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. शहरातील कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’ असून नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. अर्धवट असलेला अंबरनाथ-कल्याण रस्ता, मुख्य पाच रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. मनपा पाणी, कचरा उचलण्याचे बिल व कर्मचाऱ्यांचा पगार ही तीनच कामे करत असल्याचा आरोप केला.उल्हासनगर महापालिकेवर भाजप मित्र पक्षाची आघाडी सत्तेवर आली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात एकाही विकासकामाला सुरूवात झाली नसून पदासाठी त्यांच्यात भांडणे लागली आहेत. तोच प्रकार महापालिका प्रशासनाचा असून कारकुनी कारभाराचा प्रत्यय येत असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेने कोणतेही नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केलेले नाहीत. नगररचनाकार विभागाकडून येणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला असून आयुक्त नगररचनाकार विभागाबाबात ठोस भूमिका घेत नाही. सत्ताधारी भाजपाने नवीन नगररचनाकार आणून ठप्प पडलेला विभाग सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपा मित्र पक्षाच्या आघाडीपूर्वी महापालिकेवर शिवसेना-भाजपा, साई व रिपाइची सत्ता होती. मात्र सरकारने जकात व एलबीटी बंद करून त्याऐवजी ११ कोटीचे अनुदान सुरू केले. जकातीपासून पालिकेला दरमहा १३ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते. सरकारने त्या उत्पन्नाच्या प्रमाणात एलबीटी अनुदानाची मागणी सत्ताधारी भाजपाने सरकार दरबारी लावून धरण्याचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. पालिका पाणीबिल व कचरा उचलण्याच्या बिलासह कर्मचाऱ्यांचा पगार असे तीनच कामे करत आहेत. एलबीटी पोटीचे अनुदान व मालमत्ता कर वसुली असे दोनच उत्पन्नाचे स्त्रोत पालिकेकडे आहेत. निधीचे कारण पुढे केल्याने शहरातील विकासकामे ठप्प पडली आहेत.