शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

ठाणे, पालघरमधील पोल्ट्री व्यावसायिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शेतीला जोडधंदा म्हणून ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकरी कुक्कट पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : शेतीला जोडधंदा म्हणून ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकरी कुक्कट पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. मात्र, अनेक अडचणींमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी संघटनात्मक मार्ग काढावा, यासाठी रविवारी अनगाव येथे पोल्ट्री व्यावसायिकांचा मेळावा पार पडला. यावेळी सुमारे ३०० पोल्ट्रीधारक उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, वादळ, महापूर, बर्ड फ्लू, तसेच मागील वर्षांपासून कोरोनामुळे पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यवस्थापनाचा खर्च वाढत आहे. गरीब शेतकऱ्यांकडे स्वतःचे भांडवल नसल्याने त्यांना कंपनीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, कंपन्यांकडून शेतकऱ्याला किरकोळ मोबदला देत आहे. त्यातून शेतकऱ्यांना वीज बिल, कामगारांचा खर्च, बँकेचे कर्ज, पोल्ट्री व्यवस्थापनाचा खर्च कसा भागवायचा? यासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी एकवटले आहेत.

...तर आंदोलन करणार

ठाणे-पालघर-रायगड पोल्ट्री योद्धा या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाखाली पोल्ट्रीधारक संघटित झाले आहेत. कंपन्यांनी चालवलेली लूट व फसवणूक आता यापुढे सहन केली जाणार नाही, असा निर्धार पोल्ट्रीधारकांनी केला. या मेळाव्यात रायगड पोल्ट्री योद्धा सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर, संचालक विलास वळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. यापुढे शासनाने पोल्ट्रीधारकांच्या मागण्या मान्य न केल्यास रायगड, ठाणे, पालघर तिन्ही जिल्ह्यांत तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा खामकर यांनी दिला आहे.

-----------