शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रिक्षाचालकांच्या मदतीसाठी डाक विभागही सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ८४ हजार ४५६ परमीटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ २३ हजार ३०६ रिक्षाचालकांनी दीड हजार रुपयांच्या ...

ठाणे: ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ८४ हजार ४५६ परमीटधारक रिक्षाचालकांपैकी केवळ २३ हजार ३०६ रिक्षाचालकांनी दीड हजार रुपयांच्या अनुदानासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अर्ज केला आहे. ज्यांना बँक खात्याची समस्या असेल त्यांना न्यूनतम ठेव नसतानाही खाते उघडण्याची संधी आता भारतीय डाक विभागाने दिली आहे. याचा अनेक रिक्षाचालकांना फायदा होणार असल्याची माहिती ठाणे आरटीओने दिली.

आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरुवातही झाली आहे; मात्र उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची बाब समोर आली. कोरोनाकाळातील लॉकडाऊनचे सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी ठाणे विभागात ८४ हजार ४५६ पैकी २३ हजार ३०६ परमिटधारक रिक्षाचालकांनी अर्ज केले आहेत. त्यातील १७ हजार मंजूर झाले असून सात हजार चालकांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे.

उर्वरित काही रिक्षाचालकांना आधारकार्ड तसेच बँक खात्याची समस्या आहे. त्यामुळे आरटीओने यापूर्वीच दोन आधार केंद्र सुरू केले. आता १६ जूनपासून भारतीय डाक कार्यालयाच्या मदतीने आरटीओ ठाणे कार्यालयाच्या आवारात रिक्षाचालकांसाठी खास बँक खाते सुरू करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे आणि जयंत पाटील यांनी डाक कार्यालयात तशी मागणी केल्यानंतर डाक कार्यालयाने ती मान्य करून आरटीओ कार्यालयाच्या आवारातच पोस्टाचेही केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे बँकेची सुविधा नव्हती. त्यांचाही या अनुदानासाठी मार्ग आता मोकळा झाला आहे.