शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

प्रदूषण तीन वर्षांनी दूर होणार

By admin | Updated: October 4, 2016 02:23 IST

डोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून

मुरलीधर भवार, डोंबिवलीडोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून प्रत्यक्ष वाहिन्या टाकण्याच्या कामाला तीन वर्षांचा काळ लागेल, असे प्रतिज्ञापत्र एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केले आहे. तोवर रासायनिक सांडपाण्याचे नेमके काय करायचे याचा तिढा सोडवावा लागेल. एमआयडीसीच्या प्रतिज्ञापत्रामुळे रासायनिक कारखान्यांचे धाबे दणाणले असून ७ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. डोंबिवली आणि अंबरनाथच्या रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता ते थेट नदी आणि खाडीत सोडले जाते. त्यामुळे भूसृष्टी, जलसृष्टीवर होणारे परिणाम आणि वाहून जाणाऱ्या सांडपाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांच्या आरोग्याला उद््भवलेला धोका अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरु आहे. लवादाने मागील सुनावणीवेळी एमआयडीसीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने ते १ आॅक्टोबरला सादर केले आहे. वनशक्तीची या याचिकेवर गेली तीन वर्षे सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान लवादाने केंद्रीय प्रदूषण मंडळ व राज्य प्रदूषण मंडळाची कानउघाडणी केली. त्यानंतरच प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ रासायनिक कारखान्यांना रासायनिक सांडपाणी बंद करण्याची नोटीस बजावल्याने त्या दिवसापासून कारखाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत असल्याने लवादाने त्याची गंभीर दखल घेतली. कारखानदारांना पायाभूत सोयी सुविधा पुरविणे तसेच सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी टाकण्याची जबाबदारी, तिची देखभाल-दुरुस्ती ही एमआयडीसीची जबाबदारी आहे. ती एमआयडीसी पार पाडत नसल्याचा मुद्दा समोर आला आणि या सोयी सुविधा कधी पुरविणार, त्याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण एमआयडीसीला नोटीस बजावली आणि लवादाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.