शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण तीन वर्षांनी दूर होणार

By admin | Updated: October 4, 2016 02:23 IST

डोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून

मुरलीधर भवार, डोंबिवलीडोंबिवलीतील प्रदूषण जर कमी करायचे असेल तर रासायनिक सांडपाणी वाहून नेण्यासाठी नव्या वाहिन्या टाकाव्या लागतील. त्यांच्या निविदा मागवून प्रत्यक्ष वाहिन्या टाकण्याच्या कामाला तीन वर्षांचा काळ लागेल, असे प्रतिज्ञापत्र एमआयडीसीने राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केले आहे. तोवर रासायनिक सांडपाण्याचे नेमके काय करायचे याचा तिढा सोडवावा लागेल. एमआयडीसीच्या प्रतिज्ञापत्रामुळे रासायनिक कारखान्यांचे धाबे दणाणले असून ७ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे त्यांचे लक्ष लागले आहे. डोंबिवली आणि अंबरनाथच्या रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता ते थेट नदी आणि खाडीत सोडले जाते. त्यामुळे भूसृष्टी, जलसृष्टीवर होणारे परिणाम आणि वाहून जाणाऱ्या सांडपाण्याच्या उग्र वासामुळे नागरिकांच्या आरोग्याला उद््भवलेला धोका अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय हरित लवादाकडे सुनावणी सुरु आहे. लवादाने मागील सुनावणीवेळी एमआयडीसीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसीने ते १ आॅक्टोबरला सादर केले आहे. वनशक्तीची या याचिकेवर गेली तीन वर्षे सुनावणी सुरू आहे. त्या दरम्यान लवादाने केंद्रीय प्रदूषण मंडळ व राज्य प्रदूषण मंडळाची कानउघाडणी केली. त्यानंतरच प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथमधील १४२ रासायनिक कारखान्यांना रासायनिक सांडपाणी बंद करण्याची नोटीस बजावल्याने त्या दिवसापासून कारखाने बंद आहेत. त्यानंतरही नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होत असल्याने लवादाने त्याची गंभीर दखल घेतली. कारखानदारांना पायाभूत सोयी सुविधा पुरविणे तसेच सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी टाकण्याची जबाबदारी, तिची देखभाल-दुरुस्ती ही एमआयडीसीची जबाबदारी आहे. ती एमआयडीसी पार पाडत नसल्याचा मुद्दा समोर आला आणि या सोयी सुविधा कधी पुरविणार, त्याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण एमआयडीसीला नोटीस बजावली आणि लवादाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.