शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरला मंजूर १२५ दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालिका निवडणुकीपुरते १२५ दशलक्ष पाणी देऊन भाजपने जनतेची फसवणूक केली, आता स्वतःची पापे झाकण्यासाठी भाजप कांगावा करीत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना व काँग्रेसने दिले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी अलीकडेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक मंडळाकडून १२५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ३० दशलक्ष लीटर पाणी कमी मिळत आहे, असे जाहीर केले. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नगरसेवकांनी जनजागृती करावी, असे आवाहन खांबित यांनी केले.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन भाईंदर पूर्व भागात शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या भागात कमी पाणी सोडले जात असल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे सांगितले. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे पाणीवाटपात भेदभाव केला जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागात जास्त पाणी सोडले जाते, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, गटनेत्या नीलम ढवण यांनी बुधवारी केला.

गुरुवारी भाजपचे उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेते प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील पाणी समस्येला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शासन जबाबदार असल्याचा आरोप केला. शहरात दोन आमदार व खासदार असून शासनकडून कमी पाणी दिले जात आहे. पालिकेत भाजपची सत्ता असल्याने हेतूत: कमी पाणी दिले जात आहे. याच्या निषेधार्थ १२ एप्रिलपासून आयुक्त दालनाबाहेर धरणे धरू, असा इशारा भाजपने दिला.

भाजपच्या आरोपांवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत म्हणाले की, एमआयडीसीचे १२५ दशलक्ष लीटर पाणी काँग्रेस आघाडी शासन काळातच मंजूर झाले होते; परंतु आम्ही पाणी आणले व २४ तास पाणी देण्याचा खोटा प्रचार निवडणुकीत भाजपाने केला. निवडणुकीत भाजपचे नरेंद्र मेहतांना जनतेने पाणी पाजले आणि शहरात पाणीटंचाई सुरू झाली. महापौरांना एमआयडीसीने दिलेल्या पत्रातच ते १२५ दशलक्ष लीटर पाणी केवळ पावसाळ्यापुरते तात्पुरते होते असे स्पष्ट केले होते. यावरून भाजपाने निवडणुकीत मतांसाठी लोकांची फसवणूक केली, असा आरोप सामंत यांनी केला.

विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील म्हणाले की, एमआयडीसीकडून मिळणारे पाणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंजुरीमुळे शहराला मिळत आहे. वास्तविक उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होतो व त्याच्या नियोजनासाठी पाणीकपात यापूर्वीसुद्धा केली गेली आहे; परंतु शहरातील पाणी गळती रोखणे, समान पाणीवाटप करणे, अनधिकृत नळजोडण्या रोखणे, वितरण यंत्रणा सुधारणे यात अपयशी ठरलेल्या सत्ताधारी भाजपाने स्वतःची पापे झाकण्यासाठी हा कांगावा सुरू केल्याचा आरोप पाटील यांनी केला.

सामाजिक संस्थेचे पदाधिकारी भगवान कौशिक म्हणाले की, महापालिकेने बिल्डरांच्या नवीन बांधकाम प्रकल्पांसह अनधिकृत बांधकामे आणि स्वतःच्या क्लब, इमारती आदी बांधकामांना नव्याने नळजोडण्या दिल्या. या नळजोडण्या हजारोंच्या संख्येने आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून आजची पाणीटंचाई सत्ताधारी भाजपने निर्माण केली आहे.

.............

वाचली