शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पंतप्रधान आवास योजना : विकासकांचे प्रस्ताव धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 02:31 IST

नगरविकास विभागाची बैठकीत सारवासारव

- मुरलीधर भवारकल्याण : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना घरे मिळावीत, यासाठी खाजगी विकासकांनी त्यांच्या गृहप्रकल्पातील ३५ टक्के घरे देण्याचा प्रस्ताव महापालिकेस सादर केल्यास रहिवासी जागेवरील प्रकल्पात अडीच एफएसआय दिला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे खाजगी विकासकांनी केडीएमसीकडे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र, त्याविषयी वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे महापालिकेचे अधिकारी पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे प्रस्ताव धूळखात पडले आहेत.बिल्डरांची एमसीएचआय संघटना आणि आयुक्त गोविंद बोडके यांची विविध विषयांवर नुकतीच एक बैठक झाली. या वेळी एका बिल्डरने ‘पंतप्रधान आवास’साठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठवूनही नगररचना विभाग त्याची दखल घेत नसल्याचा मुद्दा मांडला. त्यामुळे आयुक्तांनी बैठकीत नगररचना विभागास विचारले असता या विभागाने सारवासारव केली. प्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा संबंधित बिल्डरने वारंवार केली. स्मरणपत्रेही दिली. मात्र, नगरविकास विभागाने प्रतिसाद दिला नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान आवास योजनेची घोषणा केली. त्यानुसार, मुंबई महापालिका हद्दीपासून २५ किलोमीटरच्या आत खाजगी विकासक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. १०० घरे उभारणाऱ्या विकासकाने ३५ टक्के घरे लाभार्थ्यांना द्यायची. तर, ६०० फुटांचा कारपेट एरिया लाभार्थीला मिळणार होता. मात्र, सरकारने जुन्या नियमात थोडीफार सुधारणा करून पुन्हा नवा नियम काढला. त्यानुसार, रहिवासी क्षेत्रात घर प्रकल्प करणाºया खाजगी विकासकाला वाढीव अडीच एफएसआय तर, लाभार्थीला दोन लाख ६७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. कमी आकाराच्या घरे घेणाºयास बँकेतून चार टक्के, त्यापेक्षा मोठ्या आकाराचे घर असेल तर तीन टक्के, त्यापेक्षा मोठ्या आकारच्या घरास दोन व त्याहून अधिक आकाराचे असलेल्या लाभार्थ्यास एक टक्के व्याजदराने कर्ज दिले जाईल, अशी ही योजना होती.त्यामुळे या योजनेंतर्गत संबंधित बिल्डरने महापालिकेकडे चार प्रकल्पांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी एक प्रकल्प १६ मजली, दुसरा १४ मजली आणि तिसरा व चौथा प्रकल्प हा प्रत्येकी ११ मजली होती. या चारही प्रकल्पांत लाभार्थ्यांना ३५ टक्के घरे मिळू शकली असती. मात्र, मंजुरीअभावी त्याचे प्रस्तावच धूळखात पडले आहेत.खाजगी विकासकांकडून महापालिका आॅनलाइन प्रस्ताव मागविणार आहे. मात्र त्याआधी महापालिका डिमांड सर्वेक्षण करणार आहे. २० हजार चौरस मीटरच्या जागेतील गृहप्रकल्पास पर्यावरण विभागाकडून ना-हरकत दाखला मिळविण्यासाठी विकसकाला मुंबईतील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जावे लागते होते. सरकारने हा दाखला महापालिकास्तरावर द्यावा. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी. त्याकरताही सेल स्थापन करावा. मात्र, त्यासाठीही कोणतीच सुविधा महापालिकेत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली