शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर होणार खेळाचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:57 IST

प्रस्तावातील त्रुटींमुळे झाला संभ्रम; महापालिकेचे स्पष्टीकरण

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड अधिकृत करण्यासाठीचा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला. त्यात ते कायमचे बंद केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी जागेवर असल्याने ते बंद करण्यासाठीच हा फेरबदलाचा प्रस्ताव आणल्याचे स्पष्ट केले आहे. याठिकाणी यापूर्वी जशी जागा होती, तशीच जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, त्यासाठी नियमानुसार सोपस्कार करणे गरजेचे असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्याठिकाणी खेळाचे मैदान किंवा उद्यान विकसित करण्याचा उद्देश आहे. त्यासाठीच आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. वास्तविक पाहता महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून हा प्रस्ताव आल्याने त्यात त्याचा उल्लेख आल्याने तो झाल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ऐवजी महापालिका पर्पज असे आरक्षण करण्यात येणार असून तशाप्रकारचा बदल प्रस्तावामध्ये प्रशासनाकडून केला जाणार आहे. कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची नैतिक जबाबदारी, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानांतर्गत जुन्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १०० गुण असतात. त्यामुळे दिवा कचराभूमीवर जुन्या कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली नाही तर स्वच्छ सर्व्हेक्षणातील गुण कमी होऊन शहराचा क्र मांक खालावेल. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केल्याचे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी स्पष्ट केले. डिसेंबर २0 पर्यंत पूर्ण करणार प्रकल्पदिवा कचराभूमीवर आतापर्यंत २३ लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्याची बायोमॉनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचºयामध्ये मिथेन आणि लिचेड असतो. यामुळे कचºयाला आग लागणे तसेच दुर्गंधी पसरते. या कचºयामधील प्रत्येक घटकांचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर त्याठिकाणी ती जागा पूर्वीप्रमाणेच अन्य वापरासाठी खुली केली जाते. यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच डायघर येथील कचºयाची विल्हेवाट लावून त्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याचे काम सुरू असून तो डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :dumpingकचरा