शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
3
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
5
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
6
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
7
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
8
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
9
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
10
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
11
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
12
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
13
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
14
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
15
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
16
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
17
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
18
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
19
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
20
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?

दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर होणार खेळाचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:57 IST

प्रस्तावातील त्रुटींमुळे झाला संभ्रम; महापालिकेचे स्पष्टीकरण

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड अधिकृत करण्यासाठीचा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला. त्यात ते कायमचे बंद केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी जागेवर असल्याने ते बंद करण्यासाठीच हा फेरबदलाचा प्रस्ताव आणल्याचे स्पष्ट केले आहे. याठिकाणी यापूर्वी जशी जागा होती, तशीच जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, त्यासाठी नियमानुसार सोपस्कार करणे गरजेचे असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्याठिकाणी खेळाचे मैदान किंवा उद्यान विकसित करण्याचा उद्देश आहे. त्यासाठीच आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. वास्तविक पाहता महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून हा प्रस्ताव आल्याने त्यात त्याचा उल्लेख आल्याने तो झाल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ऐवजी महापालिका पर्पज असे आरक्षण करण्यात येणार असून तशाप्रकारचा बदल प्रस्तावामध्ये प्रशासनाकडून केला जाणार आहे. कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची नैतिक जबाबदारी, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानांतर्गत जुन्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १०० गुण असतात. त्यामुळे दिवा कचराभूमीवर जुन्या कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली नाही तर स्वच्छ सर्व्हेक्षणातील गुण कमी होऊन शहराचा क्र मांक खालावेल. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केल्याचे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी स्पष्ट केले. डिसेंबर २0 पर्यंत पूर्ण करणार प्रकल्पदिवा कचराभूमीवर आतापर्यंत २३ लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्याची बायोमॉनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचºयामध्ये मिथेन आणि लिचेड असतो. यामुळे कचºयाला आग लागणे तसेच दुर्गंधी पसरते. या कचºयामधील प्रत्येक घटकांचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर त्याठिकाणी ती जागा पूर्वीप्रमाणेच अन्य वापरासाठी खुली केली जाते. यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच डायघर येथील कचºयाची विल्हेवाट लावून त्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याचे काम सुरू असून तो डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :dumpingकचरा