शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समिती क्रमांक ४च्या इमारतीचा खांब खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

उल्हासनगर : नेताजी चौकातील महापालिका प्रभाग समिती क्र. ४च्या इमारतीचा खांब खचल्यामुळे प्रभाग समिती व अग्निशमन दलाचे कार्यालय इतरत्र ...

उल्हासनगर : नेताजी चौकातील महापालिका प्रभाग समिती क्र. ४च्या इमारतीचा खांब खचल्यामुळे प्रभाग समिती व अग्निशमन दलाचे कार्यालय इतरत्र हलविण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. धोकादायक घोषित केलेल्या इमारतीच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करून इमारतीत प्रभाग समिती कार्यालय थाटण्यात आले होते.

उल्हासनगरात बेकायदा व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेताजी चौकातील प्रभाग समिती क्र. ४च्या कार्यालयाच्या इमारतीचा खांब खचला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारत रिकामी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे येथील कार्यालय महापालिका शाळा क्र. १९मध्ये हलविण्यात येत आहे. तसेच, इमारतीमधील अग्निशमन दलाचे कार्यालय व गाड्या नेताजी चौकातील जुन्या प्रभाग समिती कार्यालयाच्या ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. महापालिकेने यापूर्वीच धाेकादायक घाेषित केलेल्या या इमारतीच्या दुरुस्तीवर राजकीय नेत्यांच्या हट्टापायी तत्कालीन आयुक्तांनी आठ वर्षांपूर्वी कोट्यवधींचा खर्च केला हाेता.

प्रभाग समिती क्र. ४ पाठाेपाठ व्हीटीसी मैदान संकुलातील क्रीडा संकुल इमारतीमध्ये असलेले प्रभाग समिती क्र. ३चे कार्यालय इतरत्र हलविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या जागेवर भव्य क्रीडा संकुल उभे राहणार आहे. पुढील महिन्यात क्रीडा संकुलाचे काम सुरू होण्याचे संकेत महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. एकीकडे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असताना बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे.

चौकट

मुख्यालय इमारतीलाही गळती

महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी धोकादायक इमारतीच्या पार्श्वभूमीवर १० वर्षे जुन्या इमारतींना सरसकट १५०० पेक्षा जास्त इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या नोटिसा दिल्या, तर दुसरीकडे महापालिका मुख्यालय इमारतीला गळती लागली आहे. या मुख्यालय इमारतीमधील विविध कार्यालयांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नागरिक करत आहेत.