शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरकर कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: February 14, 2017 02:45 IST

के. व्ही. पेंढरकर कॉलेजचे प्रशासन व व्यवस्थापनाकडून मनमानी सुरू आहे. त्याचा त्रास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा

डोंबिवली : के. व्ही. पेंढरकर कॉलेजचे प्रशासन व व्यवस्थापनाकडून मनमानी सुरू आहे. त्याचा त्रास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यवस्थापन मंडळ बरखास्त करावे, या मागणीसाठी सोमवारपासून राजर्षी शाहू महाराज शिक्षक-शिक्षकेतर संघटनेने साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.संघटनेचे पदाधिकारी चिमणलाल पराठे हे कॉलेजनजीक उपोषणाला बसले आहेत. दररोज एक जण, याप्रमाणे संघटनेचे ३५ सदस्य उपोषणाला बसणार आहेत. कॉलेजचा कारभार विद्यापीठाच्या नियमावलीनुसार चालत नाही. त्यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी आहे. शिक्षक व शिक्षकेतरांना त्याचा त्रास होतो. याप्रकरणी संघटनेने राज्यपाल, संचालक आणि पोलीस आणि विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. विद्यापीठाकडून चौकशी झाली आहे. विद्यापीठाने व्यवस्थापन मंडळ बरखास्त करावे, असा शेरा मारला आहे. त्याची अंमलबजवणी केली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेचे जवळपास पन्नासपेक्षा जास्त सभासद याप्रकरणी लढा देत आहेत. त्याला दाद मिळत नसल्याने हे उपोषण छेडण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप मेढे, सचिव सुवर्णा दांडकर उपस्थित होते.साखळी उपोषणाबाबत कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई म्हणाले की, संघटनेच्या सदस्यांना उपोषणाला बसण्याचा अधिकार नाही. कॉलेज प्रशासन व व्यवस्थापनाकडून कोणावरही अन्याय झालेला नाही. मंडळ बरखास्त करण्याची मागणी म्हणजे मालकाला बरखास्त करण्याची मागणी आहे. या संघटनेतील प्रमुख दोन व्यक्ती या महाविद्यालयात प्राचार्य आणि क्लार्कपदावर कामावर होते. त्यांना महाविद्यालयातून बडतर्फ केले आहे. त्यामुळे आता ते आमचे कर्मचारी नाहीत. त्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. खालच्या न्यायालयात व्यवस्थापनाच्या बाजूने निकाल लागलेला आहे. या युनियनच्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायलयात गेलो असल्याने ते न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करीत आहेत. त्यांची मागणीच मुळात बेकायदा आहे. (प्रतिनिधी)