शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:53 IST

सरकारची अधिसूचना : अंमलबजावणी करण्याचे दिले आदेश, भार्इंदर पालिकेच्या कारवाईकडे लागले लक्ष

धीरज परब।लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : सरकारने अधिसूचना काढून राज्यातील सर्व महापालिकांसह नगरपालिका, नगरपंचायतींसाठी घनकचरा, स्वच्छता व आरोग्य उपविधी अमलात आणले आहेत. यामुळे ओला-सुका आणि घातक कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकल्यास तसेच वेगळा करून न दिल्यास दंड आकारला जाणार आहे. या उपविधीनुसार बांधकाम कचरा (डेब्रिज) टाकणे, कचरा जाळणे, खुल्या जागेवर लघुशंका - प्रातर्विधी करणे, अंघोळ करणे, प्राणी-पक्षी यांना खाऊ घालणे आदींवर प्रतिबंध घातला आहे.

केंद्राच्या पर्यावरण, वने व हवामानबदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम अमलात आणल्यानंतर एक वर्षाच्या आत नागरी स्वराज्य संस्थांनी उपविधी तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. परंतु, या संस्थांनी कार्यवाही न केल्याने गेल्यावर्षी सरकारने प्रारूप उपविधी प्रसिद्ध करून नागरी स्थानिक संस्थांकडून हरकती, सूचना मागवल्या होत्या. त्या अनुषंगाने सरकारने १ जुलैपासून उपविधीची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त व मुख्याधिकाऱ्यांवर अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित केली आहे.राज्यातील महापालिकांसाठी काढलेल्या अधिसूचनेतील मंजूर उपविधीनुसार यापुढे सार्वजनिक तसेच खाजगी जागेवर कचरा फेकणे तसेच ठेवण्यास मनाई केली आहे. वाहनांमधून प्रवास करताना बाहेर कचरा टाकल्यास कारवाई होणार आहे.डेब्रिज सार्वजनिक वा खाजगी जागेत टाकता येणार नाही. हा कचरा वेगळा ठेवून महापालिका वा त्याच्या कंत्राटदारामार्फत आवश्यक शुल्क भरून विल्हेवाट लावावी लागेल. बगिचा, फलोद्यान, फांद्यांच्या छाटणीचा कचरा शक्यतो त्याच ठिकाणी खतात रूपांतरित करणे आवश्यक आहे. महापालिकेनेही त्यासाठी आवश्यक संकलनव्यवस्था करायची आहे.कचरा निर्माण करणाºया प्रत्येकास कचरा गोळा करून पालिकेस शुल्क द्यावे लागेल. अ व ब वर्ग महापालिकेत प्रत्येक घरास महिना ६० रुपये, तर क आणि ड वर्ग महापालिकेतील प्रत्येक घरास महिना ५० रुपये शुल्क पालिकेस द्यावे लागणार आहे. फेरीवाल्यांना प्रतिमहिना अनुक्रमे १८० आणि १५० रुपये भरावे लागतील.याशिवाय विविध प्रकारच्या व्यावसायिक आस्थापना, रुग्णालये, दवाखाने, धार्मिक संस्था, शोरूम, शैक्षणिक संस्था, विवाह कार्यालये, मल्टिफलेक्स, हॉटेल आदींनाही शुल्क द्यावे लागणार आहे. या शुल्कात दरवर्षी पाच टक्क्यांप्रमाणे वाढ होणार आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर पालिका प्रशासन गांभीर्याने कार्यवाही करणार का हा खरा प्रश्न आहे. नागरिक नियमांचे पालन करतात का हाही संशोधनाचा विषय आहे.

असा आकारला जाईल दंडओला व सुका कचरा तसेच धोकादायक कचरा हा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. कचरा वेगळा करून न दिल्यास अ व ब वर्ग महापालिकेतील नागरिकांना पहिल्या वेळी ३०० रु. व त्यानंतर ५०० रु. दंड आकारला जाणार आहे. क व ड वर्ग महापालिकेतील घरमालकास पहिल्या वेळी २०० रु. व त्यानंतर ३०० रु. इतका दंड भरावा लागणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून तीन हजारांपासून १५ हजारांपर्यंतचा दंड वसूल केला जाणार आहे. कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याचे उल्लंघन करून कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे.