शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

पॅनल पद्धत अपक्षांच्या मुळावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग (पॅनल) पद्धत असेल, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग (पॅनल) पद्धत असेल, असे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे केडीएमसीची निवडणूक पॅनल पद्धतीने होणार यावर शिक्कामोर्तब झाले. पॅनल पद्धतीमुळे राजकीय पक्षांना लाभ होणार असला तरी या पद्धतीचा अपक्षांना फटका बसणार आहे. मोठ्या राजकीय पक्षातील स्थानिक प्रस्थापितांनाही हा धक्का असून त्यांना आता निवडून येण्यासाठी स्वत:च्या प्रभागासह अन्य दोन प्रभागांतील मते मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

केडीएमसीच्या आतापर्यंतच्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत. २०२० ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक पॅनल पद्धतीनेच होईल अशी शक्यता होती. महाविकास आघाडी सत्तेवर येताच त्यांनी नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली या पाच महापालिकांच्या निवडणुका एक प्रभाग एक नगरसेवक याप्रमाणे होतील, असा निर्णय जानेवारी २०२० मध्ये घेतला होता. कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. आता सरकारने त्यांचा निर्णय बदलून मुंबई महापालिका वगळता अन्य महापालिका, नगरपालिकांत तीन सदस्यीय पॅनल पद्धत लागू केली आहे. या निर्णयाप्रमाणे तीन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. पूर्वीच्या तीन प्रभागांचा मिळून एक प्रभाग होणार आहे. यातून तीन सदस्य निवडून येतील. एका मतदाराला तीन उमेदवारांना मतदान करता येणार आहे. यात आरक्षित, महिला राखीव, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचाही सहभाग असणार आहे. आरक्षणाची टक्केवारी कायम राहील, पण कोणते प्रभाग आरक्षित होतील हे लोकसंख्येच्या आधारेच ठरणार आहे.

-----------------------------------------------

अपक्षांसह प्रस्थापितांना दे धक्का

जानेवारी २०२० मध्ये एक प्रभाग एक नगरसेवक असे जाहीर केल्याने दिलासा मिळाला होता. आता पॅनल लागू केल्याने अपक्षांसह छोटे पक्ष आणि प्रस्थापितांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. पूर्वीच्या निर्णयामुळे इच्छुकांनी आपल्या प्रभागात जोरदार तयारी सुरू केली होती. या निर्णयामुळे त्याला आजूबाजूच्या दोन्ही प्रभागांतील मते मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. पुढे तीन नगरसेवक निवडून आल्यावर विकासकामांच्या श्रेयावरून त्यांच्यात स्पर्धा तसेच चढाओढही पाहायला मिळणार आहे.

---------------------------------------------------

घाेडाबाजाराला लगाम बसणार

निवडणुकांचा इतिहास पाहता केडीएमसीत १९९५ ला शिवसेनेचा पहिला महापौर सहा अपक्षांच्या पाठिंब्याने बसला होता, तर २००० च्या निवडणुकीत ११ अपक्ष निवडून आले होते. २००५ च्या निवडणुकीत १८ अपक्ष निवडून आल्याने सत्तेची सूत्रे पुन्हा त्यांच्या हाती गेली होती. अखेर त्यांच्या पाठिंब्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा महापौर अडीच वर्षे का होईना सत्तेत बसला. २०१० ला देखील ११ अपक्ष निवडून आले होते. त्यांच्या बळावर शिवसेना-भाजप सत्तारूढ झाली होती, तर २०१५ ला नऊ अपक्ष निवडून आले होते. तेही युतीच्या सत्तेत सहभागी झाले होते. प्रत्येक वेळी सत्ता स्थापन करताना घोडाबाजार होऊन अपक्षांची साथ सत्ताधाऱ्यांनी मिळविली, अशीही चर्चा होती. आता अपक्षांचे महत्त्व कमी होणार असल्याने या घोडेबाजाराला लगाम बसेल, अशी दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

------------------------------------------------------