शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

पालघरात १५ इमारतींना धोका

By admin | Updated: May 8, 2017 05:52 IST

नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत

हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत कोसळल्यास जीवित व वित्तहानीला मालकांना जबाबदार धरण्यात आले आहे.पालघर नगर परिषदेने पावसाळा तोंडावर आल्याने तुफानी पाऊस, पूर, वादळात कोसळू शकतील अशा धोकादायक ठरविलेल्या १५ इमारतीत रफीक लुलानिया - सरकारी दवाखान्या जवळ, दामू पाटील चाळ-विमल जगमोहन दामनिया, पंचायत समिती जवळ, झटकल व्हिला, मशिदीच्या पाठीमागे, शांतीलाल जैन चाळ, सरकारी दवाखान्या जवळ, मोडकी चाळ, जय जलारांम टी हाऊस, स्टेशन जवळ, नॅशनल ज्वेलर्स/सागरमल जैन इमारत स्टेशन जवळ, नाकोडा कलेक्शन/रामचंद्र तोरानी,स्टेशन जवळ, शकुंतला शाम कुमार मिश्रा,देविशा चाळ, वजली पाडा, विजय फरसाण मार्ट, स्टेशन जवळ, डॉ.एस पी जैन व श्याम अवसरमोल, यांची इमारत स्टेशन जवळ, बिस्मिल्लाह कॅटरर्स/अल्लाउद्दीन खान यांची इमारत कचेरी रोड, शांतीलाल जैन यांची इमारत राज टॉकिज जवळ, विजय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, कमला पार्क, माहीम रोड, पोषण्णा भुमण्णा संकटोल्लू यांची इमारत, पालघर, प्रवीण हरिश्चंद्र भानू यांची इमारत, टेम्भोडे इ. चा समावेश आहे. मागील ५-७ वर्षा पासून नगरपरिषदे कडून १२ इमारतींना नोटिसी बजावण्यात यायच्या मात्र या वर्षी त्यात ३ इमारतींची भर पडली आहे. प्रत्येक वर्षी नगर परिषद या इमारतीच्या मालकांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचयाती व औद्योगिक अधिनियमानुसार या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या मालक, भोगवटाधारक व वाणिज्य वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र आजपर्यंत त्या आहे तशाच आहेत. पालघर नगर परिषदेला लागूनच असलेल्या धोकादायक इमारतीला मागील अनेक वर्षापासून नोटीस बजावली जात असून या इमारती शेजारी एसटी स्टॅन्ड, भाजी मार्केट,उपविभागीय पोलीस अधिकारी याचे कार्यलय असल्याने सकाळ-संध्याकाळ नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास मोठ्या जीवितहानीच्या घटनेला सामोरे जाण्याची आपत्ती ओढवू शकते. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?नोटीस बजावण्यामागे त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. ती होत नसेल तर नगरपालिकेने अशी धोकायदायक इमारत पाडून टाकणे अपेक्षित आहे. जर त्यातील नागरिक अन्यत्र स्थलांतरीत होण्यास तयार नसतील तर त्यांना पोलीसी बलाचा वापर करून अन्यत्र देऊन इमारती खाली करून त्या पाडून टाकणे देखील अपेक्षित आहे. परंतु यातील काहीही घडून येत नाही त्यामुळेच नगरपालिका प्रशासन नोटीस बजावून आपली जबाबदारी पूर्ण करीत असली तरी त्यामुळे भविष्यातील दुर्घटना काही टळणार नाही. पालिका फक्त आम्ही नोटीस बजावली होती असे सांगून जबाबदारी झटकू शकते एवढेच.