शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
3
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
4
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
5
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
6
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
7
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
8
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
9
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
10
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
11
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
12
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
13
बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
14
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
15
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
16
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
17
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
18
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
19
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
20
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध

पालघरात १५ इमारतींना धोका

By admin | Updated: May 8, 2017 05:52 IST

नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत

हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील १५ इमारती धोकादायक असल्याच्या नोटिशी इमारत मालकांना बजावण्यात आल्या असून इमारत कोसळल्यास जीवित व वित्तहानीला मालकांना जबाबदार धरण्यात आले आहे.पालघर नगर परिषदेने पावसाळा तोंडावर आल्याने तुफानी पाऊस, पूर, वादळात कोसळू शकतील अशा धोकादायक ठरविलेल्या १५ इमारतीत रफीक लुलानिया - सरकारी दवाखान्या जवळ, दामू पाटील चाळ-विमल जगमोहन दामनिया, पंचायत समिती जवळ, झटकल व्हिला, मशिदीच्या पाठीमागे, शांतीलाल जैन चाळ, सरकारी दवाखान्या जवळ, मोडकी चाळ, जय जलारांम टी हाऊस, स्टेशन जवळ, नॅशनल ज्वेलर्स/सागरमल जैन इमारत स्टेशन जवळ, नाकोडा कलेक्शन/रामचंद्र तोरानी,स्टेशन जवळ, शकुंतला शाम कुमार मिश्रा,देविशा चाळ, वजली पाडा, विजय फरसाण मार्ट, स्टेशन जवळ, डॉ.एस पी जैन व श्याम अवसरमोल, यांची इमारत स्टेशन जवळ, बिस्मिल्लाह कॅटरर्स/अल्लाउद्दीन खान यांची इमारत कचेरी रोड, शांतीलाल जैन यांची इमारत राज टॉकिज जवळ, विजय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था, कमला पार्क, माहीम रोड, पोषण्णा भुमण्णा संकटोल्लू यांची इमारत, पालघर, प्रवीण हरिश्चंद्र भानू यांची इमारत, टेम्भोडे इ. चा समावेश आहे. मागील ५-७ वर्षा पासून नगरपरिषदे कडून १२ इमारतींना नोटिसी बजावण्यात यायच्या मात्र या वर्षी त्यात ३ इमारतींची भर पडली आहे. प्रत्येक वर्षी नगर परिषद या इमारतीच्या मालकांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचयाती व औद्योगिक अधिनियमानुसार या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या मालक, भोगवटाधारक व वाणिज्य वापर करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मात्र आजपर्यंत त्या आहे तशाच आहेत. पालघर नगर परिषदेला लागूनच असलेल्या धोकादायक इमारतीला मागील अनेक वर्षापासून नोटीस बजावली जात असून या इमारती शेजारी एसटी स्टॅन्ड, भाजी मार्केट,उपविभागीय पोलीस अधिकारी याचे कार्यलय असल्याने सकाळ-संध्याकाळ नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा वेळी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास मोठ्या जीवितहानीच्या घटनेला सामोरे जाण्याची आपत्ती ओढवू शकते. दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?नोटीस बजावण्यामागे त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. ती होत नसेल तर नगरपालिकेने अशी धोकायदायक इमारत पाडून टाकणे अपेक्षित आहे. जर त्यातील नागरिक अन्यत्र स्थलांतरीत होण्यास तयार नसतील तर त्यांना पोलीसी बलाचा वापर करून अन्यत्र देऊन इमारती खाली करून त्या पाडून टाकणे देखील अपेक्षित आहे. परंतु यातील काहीही घडून येत नाही त्यामुळेच नगरपालिका प्रशासन नोटीस बजावून आपली जबाबदारी पूर्ण करीत असली तरी त्यामुळे भविष्यातील दुर्घटना काही टळणार नाही. पालिका फक्त आम्ही नोटीस बजावली होती असे सांगून जबाबदारी झटकू शकते एवढेच.