शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

वाड्यातील भातशेती झाली परवडेनाशी

By admin | Updated: July 28, 2015 23:31 IST

जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला. पुर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरेनुसार शेतातील देवांना

वाडा : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सर्वच तालुक्यांतील गाव-पाड्यांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला. पुर्वापार चालत आलेल्या रूढी-परंपरेनुसार शेतातील देवांना ‘पोळी-भाजी’चा नैवेद्य देवून शेतकऱ्यांनी कामांना सुरूवात केली. मात्र एकाच वेळी सर्वच तालुक्यांमध्ये लावणीच्या कामांना सुरूवात झाल्याने मजूरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहुन मजूर आणावे लागतात. त्यात मजूरांचे दरही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एका शेत मजुराला दररोज २५० ते ३०० रूपये व दुपारच्या जेवणाचा खर्च द्यावा लागतो. या सर्व कारणांमुळे शेती व्यवसाय हा जास्त कष्टाचा आणि खर्चीक होऊ लागला आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नसल्याचे स्थानिक शेतकरी सांगतात.नाले, बंधारे असणाऱ्या ठिकाणी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. अशा क्षेत्रांची फारशी उपलब्धता नाही तरीही वनराई बंधारे, के. टी. बंधारे, रानतळी अशा स्वरूपात काही प्रमाणावर पाण्याचा साठा असणारे ४० स्त्रोत उपलब्ध आहेत. तालुक्यात अलीकडे काही भागातून आंबा, केळी, पेरू, काजु, पपई अशा फळबागा होत असून बरेचसे शेतकरी बागायती शेती करू लागले आहेत. पाच नद्या या तालुक्यातून वाहत असून बाराही महिने त्यांना पाणी असते असे नैसर्गिक संपत्तीचे वरदान या तालुक्याला लाभले आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या होती. १९९५ पासून या तालुक्यात उद्योगधंदे आल्यामुळे नदी व खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्यासाठी शेकडो मजूर जातात. भातशेतीसाठी पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षापासून मिळत नसल्याने भातपिकाची लागवड कशी करायची असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. भात लावणीसाठी जिल्ह्णात कोठेही यांत्रिक अवजारे नाहीत. काही जिल्ह्णात कृषी विद्यापीठाने तयार केलेली भात लावणी यंत्रे महागडी असल्याने शेतक ऱ्यांना परवडू शकत नाहीत. त्यामुळे भातशेती संकटात सापडली आहे.१९९५ पासून वाड्यात पसंतीत असलेल्या औद्योगिक कारखानदारीने बेसुमार भर पडत असूनही शासन त्यांना कोट्यावधीच्या सवलती देवून व कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. परिणामी या तालुक्यातील तांदुळ, सुपिक जमीन कारखान्यांच्या पायाखाली तुडवली जाऊन नापीक झाली. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शेतकऱ्यांनी आपल्या सोन्यासारख्या जमीनी कारखानदारांना विकून टाकल्या आहेत. आजही ती स्पर्धा सुरूच आहे. यामुळे भाताचे कोठार हा मान लयाला जाऊ शकतो. वाडा तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे असून १५३३५ हेक्टर क्षेत्र आजही भात पिकाखाली आहे. त्यापैकी १३८०० हेक्टर क्षेत्र हे पूर्ण पावसावर अवलंबून असणारे क्षेत्र आहे. येथील शेतकरी वाडा कोलम, झिनी, सुरती, गुजरात ११, गुजरात ०४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत व मसुरी आदी भातांच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात. वाड्यात ४२५ हेक्टर क्षेत्रात नांगलीचे उत्पन्न घेतले जाते. ९५० हेक्टर क्षेत्रात कडधान्य, १६० हेक्टर क्षेत्रात गळीत धान्य तर अन्य रब्बी पिके ३० हेक्टर क्षेत्रामध्ये घ्ोतली जातात.ठाणे जिल्ह्णातील वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून फार पुर्वी प्रसिद्ध आहे. येथील जमिन पाणी धरून ठेवणारी असल्याने भाताचे उत्तम पीक वाडा कोलम हा वाड्यातील प्रसिद्ध तांदुळ आजही बाजार पेठेत होता मात्र अलीकडे वाडा कोलम प्रतिकृती गुजरात व अन्य ठिकाणाहून मिळत असल्याची चर्चा ऐकायला मिळते. मात्र स्थानिक शेतकरी आजही वाडा कोलम प्रत टिकून आहे.