शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

आम्हाला घाबरूनच सोयीची प्रभाग रचना

By admin | Updated: October 14, 2016 06:31 IST

ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे. हा परिसर नवे ठाणे म्हणून पुढे येत

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रात कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर पट्ट्यात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे. हा परिसर नवे ठाणे म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे या परिसरात वाढलेल्या लोकसंख्येला विचारात घेऊन येथे नगरसेवकांची संख्या वाढवणे गरजेचे होते. मात्र, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य असल्याने पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठीच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने या ठिकाणची मतदारांची संख्या वाढवून राष्ट्रवादीसोबत रडीचा डाव खेळल्याचा आरोप करून याविरोधात निवडणूक आयोगाकडे दाद मागितली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण पालिका प्रशासनाने ७ आॅक्टोबरला लॉटरी पद्धतीने जाहीर केले. प्रभागाची रचना करताना प्रशासनाने ५६ हजार लोकसंख्येची सीमारेषा ठरवली. या लोकसंख्येत १० टक्के कमी किंवा अधिक ही मुभाठेवली. त्याचा फटका नवे ठाणे म्हणून वाढणाऱ्या कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर येथे वाढलेल्या लोकसंख्येला बसणार आहे. नव्या ठाण्याच्या प्रभागातील मतदारांच्या संख्येचा निकष १० टक्क्यांनी वाढून ती ६५ हजार झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अशा ठिकाणी प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या वाढवणे गरजेचे होते. परंतु, या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जास्त असल्याने सेना आणि भाजपाने प्रशासनाला हाताशी धरून जाणीवपूर्वक अशी चुकीची प्रभागरचना जाहीर केली आहे. नवे ठाणे म्हणून या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याप्रमाणात नगरसेवकांची संख्या वाढवायला होती. (प्रतिनिधी)