शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

आरक्षित भूखंडावरील मालमत्ता हस्तांतरणाचे आदेश

By admin | Updated: August 11, 2015 23:37 IST

महापालिकेने १८ आरक्षित भुखंडावर बांधकाम परवाने दिले असून बिल्डरांनी अटी व शर्ती नुसार विकसित मालमत्ता अद्यापही हस्तांतरीत केली नाही. परिणामी, २५ टक्के विकसित

उल्हासनगर : महापालिकेने १८ आरक्षित भुखंडावर बांधकाम परवाने दिले असून बिल्डरांनी अटी व शर्ती नुसार विकसित मालमत्ता अद्यापही हस्तांतरीत केली नाही. परिणामी, २५ टक्के विकसित मालमत्ता हस्तांतरीत करा अन्यथा परवाने रद्द करण्याच्या नोटिसा मालमत्ता विभागाने बजावले आहेत. उल्हासनगर महापालिकेने १५ वर्षापूर्वी आरक्षित असलेल्या भूखंडावर काही अटी व शर्तीवर बांधकामास परवानगी दिली आहे. बांधकाम विकासकांनी भूखंड विकसित केल्यानंतर २५ टक्के मालमत्ता पालिकेच्या नावे करून देण्याची जबाबदारी होती. मात्र बिल्डरांबरोबरच पालिकेलाही स्वत:च्याच मालमत्तेचा विसर पडल्याने कोट्यवधींच्या मालमत्तेचा उपभोग हे बांधकाम व्यावसायिक वर्षानुवर्षे घेत आहे. याबाबतची ओरड झाल्यावर मालमत्ता हस्तांतरीत करा, अन्यथा परवाने रद्द करण्याच्या नोटिसा पालिकेला काढाव्या लागल्या आहेत.१८ आरक्षित भूखंडापैकी वुडलँड कॉॅम्पलेक्स मधील एक मजला, इंदिरा गांधी भाजी मार्केट शेजारील इमारती मधील १४ व्यापारी गाळे, अम्ब्रोसिया हॉटेलमागील ८३० चौ.मीटरची जागा, तसेच रिजेन्सी कंपनीने कब्रस्तान व एमएसईबी टॉवर्स साठी ३ एकरची जागा पालिकेच्या नावे करून दिली आहे. इतर १३ भूखंडावरील विकसित कोटयावधीची मालमत्ता गेल्या १५ वर्षापासून बिल्डर वापरत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करून संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेण्याची मागणी पालिका महासभेत झाली आहे.महापालिका मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी आरक्षित भुखंडावरील विकसित मालमत्ता हस्तांतरीत करण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. विशिष्ट मुदतीत बिल्डरांनी मालमत्ता हस्तांतरीत करावी अन्यथा बांधकाम परवाने रद्द करून आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिका सुरू करणार असल्याचा इशारा आयुक्त मनोहर हिरे यांनी दिला आहे. भूखंडावरील कोट्यवधीच्या विकसित मालमत्तेत स्थानिक राजकिय नेत्यांचे हितसंबध गुंतले असून बांधकाम विकासक पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखविणार असल्याची चर्चा आहे. पालिका मालमत्ता विभागाने भूखंडावरील मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करताच बिल्डरांनी पालिकेसह राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. तर समाजमंदिराप्रमाणेच नाममात्र दराने दिलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. (प्रतिनिधी)