शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

एमपीएससी परीक्षेला संधींचे बंधन, ठाण्यातील विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 23:47 IST

किमान संधींची संख्या तरी वाढवावी : विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने परीक्षा देण्याबाबत संधीची कमाल मर्यादा जाहीर केली आणि ठाण्यातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. काहींना हा निर्णय योग्य वाटत असला तरी संधीची संख्या आणखी वाढवण्याची त्यांची अपेक्षा आहे. 

आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अनेक विद्यार्थी बरीच वर्षे करत असतात. स्पर्धा परीक्षेत चांगला रँक मिळवणे हेच त्यांचे एकमेव लक्ष्य असते. त्यासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मुंबई, ठाणे, पुणेसारख्या शहरात येऊन तयारी करतात. काही विद्यार्थी पार्ट टाइम नोकरी करून परीक्षा देतात. एमपीएससीच्या परीक्षेसोबतच काही विद्यार्थी इतरही विविध शासकीय, बॅंकिंगच्या परीक्षा देतात. याचा अनुभव घेतात. मात्र आयोगाच्या या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. 

अशाप्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

संधीवर मर्यादा घालणे अयोग्यमी आतापर्यंत चार वेळा एमपीएससीची परीक्षा दिली आहे. मात्र अपेक्षित गुण मिळाले नाही म्हणून दरवेळी अधिकाधिक तयारी करून परीक्षा देतो. परीक्षाही दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे ठरावीक संधीत परीक्षेत चांगला रॅंक मिळवणे कठीण आहे. संधीवर मर्यादा घालणे हे अयोग्य आहे.         दिग्विजय रांजणे, उमेदवार

स्पर्धा पण वाढते आहेमी गेली दोन वर्षे एमपीएससीची तयारी करतो आहे. मात्र परीक्षा एकदाच दिली. परीक्षा देणार्यांची संख्याही वाढतेय आणि स्पर्धा पण वाढतेय. परीक्षेसाठी संधीची मर्यादा घातली ते एखादवेळ योग्य वाटते. पण साधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संधी अजून द्यायला हव्यात.     रमण यमवारे, उमेदवार

संधींची संख्या काहीशी वाढवावीएमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे कितीही चांगला अभ्यास केला तरी अपेक्षित नंबर मि‌ळवणे जरा कठीण झाले आहे. त्यामुळे संधीबाबत मर्यादा घातल्या हे काही अंशी योग्य असले तरी त्या संधीची संख्या वाढली पाहिजे.     रामेश्वरी पाटकर, उमेदवार

सर्वसाधारण प्रवर्गाचे जास्त नुकसानसंधीची संख्याही कमी आहे. त्यात पूर्व परीक्षेत भाग घेणे किंवा परीक्षेच्या टप्प्यावर अपात्र ठरले किंवा काही कारणाने रद्द झाले तरी ती संधी म्हणून गणली जाणार असेल तर ते चुकीचेच आहे. अशाने सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे तर मोठे नुकसान होणार आहे. याचा फेरविचार व्हावा.      मनाक्षी भोसले, उमेदवार

टॅग्स :thaneठाणेMPSC examएमपीएससी परीक्षा