शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणानंतरच मालमत्ता होणार सील

By admin | Updated: May 24, 2017 01:02 IST

सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. सागर इन्व्हेस्टमेंटच्या प्रमुखांच्या नावे जी काही संपत्ती आहे त्याचे सर्वेक्षण करून माहिती घेतली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. सागर इन्व्हेस्टमेंटच्या प्रमुखांच्या नावे जी काही संपत्ती आहे त्याचे सर्वेक्षण करून माहिती घेतली जात आहे. ही माहिती गोळा झाल्यावरच त्या मालमत्ता सील केल्या जातील असे तपास अधिकारी सुलभा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. तसेच सागर इन्व्हेस्टमेंच्या नावाने आणि त्यांच्या संचालकांच्या नावे असलेले सर्व बँक खात्यांमधील व्यवहार थांबविण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सागर इन्व्हेस्टमेंटच्या गैरव्यवहार प्रकरणात ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असून या प्रकरणात सागरचे प्रमुख सुहास समुद्र आणि सुनीता समुद्र यांनी शरणागती पत्करली असली तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. या प्रकरणात ठोस पुरावे जमवण्यावरच भर देण्यात आला आहे. समुद्र यांच्याकडून सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यांच्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या संपत्तीची आणि केलेल्या गुंतवणूकीची माहितीही घेतली जात आहे. जागा, व्यापारी गाळे, दुकाने, फ्लॅट आणि प्लॉट यांची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोबत ज्या- ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे त्यांची माहिती मिळवण्यात येत आहे. सागर इन्व्हेस्टमेंटचे आर्थिक व्यवहार ज्या सी.ए. मार्फत केले जात होते त्याच्याकडूनही माहिती मिळवण्याचे काम केले जात आहे. समुद्र कुटुंबातील सदस्य परदेशात गेले आहेत की नाही याचीही माहिती पोलीसांमार्फत घेतली जात आहे. गुंतवणूकदारांचा सर्वाधिक रोष हा सुहास समुद्र यांचा मुलगा श्रीराम याच्यावर आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीराम हा पोलिसांना सापडलेला नाही. तो परदेशात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र श्रीराम हा महाराष्ट्राचत लपल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच तो परदेशात पळून जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. समुद्र कुटुंबियांच्या नावे असलेले सर्व बँक खाती आणि सागर इन्व्हेस्टमेंटचे सर्व बँक खात्यातील व्यवहार थांबविण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. गुंतवणूकदार हवालदिल झाले असून त्यांनी अनेक नेत्यांना साकडे घातले आहे.