शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

ठाण्यातील ४० टक्के शाळांनीच पूर्ण केली गुणदान प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दहावीचे मू्ल्यमापन प्रक्रियेत शाळांना गुणदान प्रक्रियेसाठी काही कालावधी दिला होता. मात्र, ठाणे ...

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : दहावीचे मू्ल्यमापन प्रक्रियेत शाळांना गुणदान प्रक्रियेसाठी काही कालावधी दिला होता. मात्र, ठाणे जिल्ह्यातील केवळ ४० टक्के शाळांनीच ही गुणदान प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यामुळे आता निकालास उशीर झाला तर त्यास ठाण्यातील शाळासुद्धा जबाबदार राहणार आहेत.

कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्याही परीक्षा झाल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना अंतर्गत मूल्यमापन करून गुणदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या गुणदानाचे काम करण्याची जबाबदारी राज्यभरातील शिक्षकांना दिली होती. शाळेत जाऊन त्यांना ते गुणदान प्रक्रिया करायची आहे. ३० जून त्यासाठीची अंतिम मुदत दिली होती. मात्र, ३० जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यातील केवळ ४० टक्के शाळांनी ही गुणदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित ६० टक्के शाळांचे काम सुरूच असून, ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. शिक्षकांना शाळेत पोहोचण्याबाबत वाहतूक साधनांच्या अडचणी असल्याने या प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचे काही शिक्षक सांगतात.

-------------

ठाणे जिल्ह्यातील ४० टक्के शाळांनी दहावीची गुणदान प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित ६० टक्के शाळांचे काम सुरू आहे. रेल्वे प्रवास शिक्षकांना करता येत नसल्याने शिक्षकांना शाळेत पोहोचणे कठीण होते आहे. त्या कामासाठी शासन अजून मुदतवाढ देईल, त्यात ते काम शाळांकडून पूर्ण केले जाईल.

शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, (माध्य), ठाणे जिल्हा

------------

आम्हा शिक्षकांना सर्रासपणे ट्रेनने प्रवास करता येत नाही. त्यामुळे अनेकदा शाळेत वेळेवर पोहोचण्याची गैरसोय होते. परिणामी कामाला उशीर होतोय. तसेच काहीवेळा तांत्रिक अडचणींमुळे हे काम खोळंबते, अशी माहिती काही शिक्षतांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

----------

जिल्ह्यातील ४० टक्के शाळांनीच पूर्ण केली गुणदान प्रक्रिया