शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

जिल्ह्यात एक लाख १० हजार शहरी शिधापत्रिकाधारक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

ठाणे : गरजूंच्या दोनवेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दरमहिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. ...

ठाणे : गरजूंच्या दोनवेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दरमहिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक कार्डधारक या सवलतीचा लाभच घेत नसल्याचे आढळून आले. त्यानुसार रेशनच्या धान्याचा लाभ न घेणाऱ्या शहरी भागातील कार्डधारकांची संख्या एक लाख १० हजार असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाच्या तपासणीत समोर आली. त्यामुळे धान्य न घेणाऱ्या कार्डधारकांचे कार्ड वगळले होते. त्यापैकी दोन हजार ८०० शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप कार्यालयात येऊन पुन्हा आपल्या शिधापत्रिका पात्र करून सक्रिय केल्याची माहिती ठाणे परिमंडळ शिधावाटप, उपनियंत्रक अधिकारी नरेश वंजारी यांनी दिली.

ठाणे उपनियंत्रक कार्यालयाअंतर्गत १३ रेशन कार्यालये असून, एकूण कार्डधारकांची संख्या सुमारे सहा लाख ७५ हजार आहे. ई-पॉस मशीनद्वारे गरिबांना या दुकानातून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. या मशीनमुळे अन्नधान्याच्या वितरणात पारदर्शकता आली असून, धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांना जरब बसविण्यास मदत झाली आहे. नवीन यंत्रणेमुळे दररोज अन्नधान्याची किती उचल झाली, याची माहिती एका क्लिकवर समजू लागली असून, दुकानदाराच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानांवर स्वस्तात धान्याचे वाटप करण्यात येत असून, याचा मोठ्या संख्येने गोरगरीब लाभ घेत आहेत. असे असताना, दुसरीकडे अनेक शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे त्यांचा धान्याचा कोटा पडून राहतो. मागील पाच महिन्यांपासून एकदाही धान्य न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची यादी तयार केली जाते. शिवाय त्या-त्या रेशन दुकानातही यादी प्रसिद्ध केली जाते. दुकानदारही अन्य कार्डधारकांकडे याबाबत चौकशी करतो. यादीनुसार एक महिन्यासाठी ही कार्ड निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येते. तरीही कार्डधारकांनी प्रतिसाद न दिल्यास ते रद्द केले जात असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाने दिली.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात शिधावाटप विभागाकडे एकूण कार्डधारकांपैकी एक लाख १० हजार कार्डधारकांनी मागील पाच महिन्यांत धान्याची उचलच न केल्याने त्यांचे कार्ड रद्द केले. त्यापैकी दोन हजार ८०० शिधापत्रिकाधारकांनी पुन्हा शिधावाटप विभागाशी संपर्क करून आमचे कार्ड बंद असल्याचे सांगून ते पुन्हा पात्र करून सक्रिय केल्याची माहिती ठाणे परिमंडळ शिधावाटप, उपनियंत्रक अधिकारी नरेश वंजारी यांनी दिली.