शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात अधिकाऱ्यांची अरेरावी

By admin | Updated: February 29, 2016 01:44 IST

पालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाचा संबंध सर्वच नागरिकांशी निगडित असतो. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वांसोबत शांत आणि नम्रपणे बोलणे गरजेचे आहे.

अंबरनाथ : पालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाचा संबंध सर्वच नागरिकांशी निगडित असतो. त्यामुळे येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वांसोबत शांत आणि नम्रपणे बोलणे गरजेचे आहे. मात्र, अंबरनाथ पालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील अधिकारी आणि ते काम करणारे लिपीक हे सर्वसामान्य नागरिकांसोबत अरेरावीची भाषा वापरत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे काम करण्यास विलंब लावत आहेत. त्यांच्या या उद्धटपणाचा अनुभव अंबरनाथच्या दोघा नागरिकांना आला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारदेखील केली आहे.जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी करण्याची जबाबदारी ज्या कार्यालयात आहे, तेथील अधिकाऱ्यांचा उर्मटपणा पालिकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. एकीकडे सरकार सेवा हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्वरित माहिती आणि कागदपत्रे देण्याचा प्रयत्न करीत आहे. खासकरून जन्म आणि मृत्यूशी संबंधित दाखले एक ते दोन दिवसांत देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाच्या या चांगल्या योजनेला हरताळ फासण्याचे काम या विभागातील अधिकारी करीत आहेत. या विभागाची जबाबदारी असलेले अशोक जाधव आणि त्यांना मदतीसाठी असलेले दीपक बोरसे हे कर्मचारी नागरिकांना सेवा देण्यास विलंब लावत आहेत. दाखले वेळेवर देणे तर सोडाच, एखादी माहिती विचारली तरी ती माहिती देण्यास ते टाळाटाळ करतात.याचा प्रत्यय गुरुवारी चंद्रशेखर भुयार आणि गणेश गायकवाड या दोघा नागरिकांना आला. दहन दाखला घेण्यासाठी हे दोघे या कार्यालयात गेले असता त्यांनी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवली. मात्र, ती न चाळताच बोरसे यांनी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यावरही त्यांनी कागदपत्रांची छाननी केली नाही. उलट, पोलीस अपघातांचा पंचनामा कार्यालयात बसून बनवतात. तो चालणार नाही, अशी भूमिका घेऊन पोलिसांच्या कामाच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दाखला न देताच बोरसे यांनी आपले वरिष्ठ अधिकारी अशोक जाधव यांच्याकडे त्यांना पाठविले. त्यांच्याकडे तर बोरसेंपेक्षाही अधिकच वाईट अनुभव त्यांना आला. यासंदर्भात मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. तर, आरोग्य विभागाचे प्रमुख सुरेश पाटील यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया दिली. (प्रतिनिधी)