शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये विवाह नोंदणीची संख्या घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:21 IST

धास्ती लॉकडाऊनची

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पहिल्या लॉकडाऊनमध्ये नियोजित विवाह सोहळे रद्द झाल्यानंतर उपवर वर-वधू हे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे वळले होते. त्यामुळे असे विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसाला ३५ ते ४० च्या आसपास गेली होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत असून ही संख्या कमी झाल्याचे निरीक्षण जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने नोंदविले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाले आणि एप्रिल, मे महिन्यात ठरविलेले विवाह सोहळे अनेकांना रद्द करून पुढे ढकलावे लागले. अशांनी नंतर नोंदणी पद्धतीने विवाह करण्याला पसंती दिल्याने ही संख्या वाढत गेली. लॉकडाऊन आधी दिवसाला कधी ५, कधी १० तर एखादा अनोखा मुहूर्त असेल तर अगदी २०-२२ विवाह सोहळे पार पाडत. परंतु, लॉकडाऊनमुळे ही संख्या दुपटी-तिपटीने वाढू लागली. परंतु, या लॉकडाऊनमध्ये उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालयातील नियोजित विवाह सोहळे तर रद्द झालेच परंतु, कोरोनाच्या धास्तीने नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्यादेखील घटली, असे विवाह अधिकारी अनिल यादव यांनी सांगितले. या लॉकडाऊनमध्ये आता ही संख्या अर्ध्यावर आली असून १०-१५-२० अशा संख्येने विवाह सोहळे होत आहेत.

५० जोडपी विवाहबद्धnगुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या भीतीने विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी जास्त संख्येने जोडपी हजर होती. तब्बल ५० जोडपी विवाहबंधनात अडकली, अशी माहिती यादव यांनी दिली.nराज्य सरकारने २२ एप्रिलपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात केवळ १५ टक्के उपस्थिती हाेती.nकार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांवर या वाढलेल्या संख्येमुळे गुरुवारी काहीसा ताण होता.