शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’कडे मालमत्ता कराची एक अब्ज २२ कोटी ९३ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी केडीएमसीला एक अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी केडीएमसीला एक अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ५६८ रुपये येणे बाकी आहे. मनपाच्या मालमत्ता विभागाने या रकमेचे मालमत्ता कराचे बिल २९ एप्रिलला काढले आहे. सामान्य करदात्याकडे कराची थकबाकी राहिल्यास मनपा त्याच्याविरोधात जप्तीची कारवाई करते. मग या कंपनीकडून इतकी मोठी रक्कम थकीत असताना कंपनीविरोधात मनपाकडून वसुलीसाठी ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

मनपाकडून माहितीच्या अधिकारात घाणेकर यांनी हा तपशील मागितला होता. चालू कराची मागणी, त्यावरील दंड आणि थकबाकीवरील व्याज आकारणीच्या विरोधात मनपा विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. त्याचा निकाल मनपाच्या बाजूने लागला होता. त्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता तेथेही मनपाच्या बाजूने निकाल लागला आहे. मनपाने कंपनीची जमीन व मिळकत जप्तीची नोटीस कंपनीच्या गेटवर लावली होती. मात्र, तरीही कंपनीने ही रक्कम भरलेली नाही.

कंपनी २००९ पासून बंद असून, टाळेबंदी लागू करण्यात आली. कंपनीची जागा अदानी उद्याेग समूहाने लिलावात घेतली आहे. मात्र, कंपनीची थकबाकीची रक्कम कोण भरणार, याविषयी सुस्पष्टता नाही. एखाद्या कंपनीकडे थकबाकी असताना नॅशनल कंपनी लॉ लवादाने लिलावास मान्यता कशी दिली, असा सवाल घाणेकर यांनी केला आहे. त्याला मनपानेही कशाच्या आधारे ना-हरकत दाखला दिला असाही प्रश्न आहे. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे कंपनीची मिळकत हस्तांतरित कशी झाली, याची चौकशी करावी. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा प्रकार झाला, त्यांच्या वेतनातून ही रक्कम वळती करून घ्यावी. याप्रकरणी मनपाने पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागवून भोगवटादार कंपनीस जागा वापराकरिता मज्जाव करावा, अशी मागणी आयुक्तांकडे घाणेकर यांनी केली आहे.

बिल एनआरसीच्या नावे कसे?

मी कल्याणकर संस्थेने उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी १८ दिवसांचे आंदोलन नदी पात्रात केले. त्यावेळी ही जागा अदानी उद्योग समूहाने घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मनपाने जप्त केलेली मिळकत अन्य कंपनी कशी वापरू शकते. कामगारांची देणी दिल्याशिवाय या जागेचा वापर अन्य कोणाला करू देता कामा नये. कंपनीची मिळकत अदानीने घेतली असतानाही मनपाने मालमत्ता कराचे बिल ‘एनआरसी’च्या नावाने काढले आहे, ही बाबही आश्चर्यकारक आहे, असे घाणेकर म्हणाले.

----------------