शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

‘एनआरसी’कडे मालमत्ता कराची एक अब्ज २२ कोटी ९३ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी केडीएमसीला एक अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी केडीएमसीला एक अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ५६८ रुपये येणे बाकी आहे. मनपाच्या मालमत्ता विभागाने या रकमेचे मालमत्ता कराचे बिल २९ एप्रिलला काढले आहे. सामान्य करदात्याकडे कराची थकबाकी राहिल्यास मनपा त्याच्याविरोधात जप्तीची कारवाई करते. मग या कंपनीकडून इतकी मोठी रक्कम थकीत असताना कंपनीविरोधात मनपाकडून वसुलीसाठी ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

मनपाकडून माहितीच्या अधिकारात घाणेकर यांनी हा तपशील मागितला होता. चालू कराची मागणी, त्यावरील दंड आणि थकबाकीवरील व्याज आकारणीच्या विरोधात मनपा विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. त्याचा निकाल मनपाच्या बाजूने लागला होता. त्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता तेथेही मनपाच्या बाजूने निकाल लागला आहे. मनपाने कंपनीची जमीन व मिळकत जप्तीची नोटीस कंपनीच्या गेटवर लावली होती. मात्र, तरीही कंपनीने ही रक्कम भरलेली नाही.

कंपनी २००९ पासून बंद असून, टाळेबंदी लागू करण्यात आली. कंपनीची जागा अदानी उद्याेग समूहाने लिलावात घेतली आहे. मात्र, कंपनीची थकबाकीची रक्कम कोण भरणार, याविषयी सुस्पष्टता नाही. एखाद्या कंपनीकडे थकबाकी असताना नॅशनल कंपनी लॉ लवादाने लिलावास मान्यता कशी दिली, असा सवाल घाणेकर यांनी केला आहे. त्याला मनपानेही कशाच्या आधारे ना-हरकत दाखला दिला असाही प्रश्न आहे. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे कंपनीची मिळकत हस्तांतरित कशी झाली, याची चौकशी करावी. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा प्रकार झाला, त्यांच्या वेतनातून ही रक्कम वळती करून घ्यावी. याप्रकरणी मनपाने पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागवून भोगवटादार कंपनीस जागा वापराकरिता मज्जाव करावा, अशी मागणी आयुक्तांकडे घाणेकर यांनी केली आहे.

बिल एनआरसीच्या नावे कसे?

मी कल्याणकर संस्थेने उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी १८ दिवसांचे आंदोलन नदी पात्रात केले. त्यावेळी ही जागा अदानी उद्योग समूहाने घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मनपाने जप्त केलेली मिळकत अन्य कंपनी कशी वापरू शकते. कामगारांची देणी दिल्याशिवाय या जागेचा वापर अन्य कोणाला करू देता कामा नये. कंपनीची मिळकत अदानीने घेतली असतानाही मनपाने मालमत्ता कराचे बिल ‘एनआरसी’च्या नावाने काढले आहे, ही बाबही आश्चर्यकारक आहे, असे घाणेकर म्हणाले.

----------------