शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

‘एनआरसी’कडे मालमत्ता कराची एक अब्ज २२ कोटी ९३ लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी केडीएमसीला एक अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीकडून मालमत्ता करापोटी केडीएमसीला एक अब्ज २२ कोटी ९३ लाख २३ हजार ५६८ रुपये येणे बाकी आहे. मनपाच्या मालमत्ता विभागाने या रकमेचे मालमत्ता कराचे बिल २९ एप्रिलला काढले आहे. सामान्य करदात्याकडे कराची थकबाकी राहिल्यास मनपा त्याच्याविरोधात जप्तीची कारवाई करते. मग या कंपनीकडून इतकी मोठी रक्कम थकीत असताना कंपनीविरोधात मनपाकडून वसुलीसाठी ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

मनपाकडून माहितीच्या अधिकारात घाणेकर यांनी हा तपशील मागितला होता. चालू कराची मागणी, त्यावरील दंड आणि थकबाकीवरील व्याज आकारणीच्या विरोधात मनपा विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली होती. त्याचा निकाल मनपाच्या बाजूने लागला होता. त्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता तेथेही मनपाच्या बाजूने निकाल लागला आहे. मनपाने कंपनीची जमीन व मिळकत जप्तीची नोटीस कंपनीच्या गेटवर लावली होती. मात्र, तरीही कंपनीने ही रक्कम भरलेली नाही.

कंपनी २००९ पासून बंद असून, टाळेबंदी लागू करण्यात आली. कंपनीची जागा अदानी उद्याेग समूहाने लिलावात घेतली आहे. मात्र, कंपनीची थकबाकीची रक्कम कोण भरणार, याविषयी सुस्पष्टता नाही. एखाद्या कंपनीकडे थकबाकी असताना नॅशनल कंपनी लॉ लवादाने लिलावास मान्यता कशी दिली, असा सवाल घाणेकर यांनी केला आहे. त्याला मनपानेही कशाच्या आधारे ना-हरकत दाखला दिला असाही प्रश्न आहे. एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे कंपनीची मिळकत हस्तांतरित कशी झाली, याची चौकशी करावी. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा प्रकार झाला, त्यांच्या वेतनातून ही रक्कम वळती करून घ्यावी. याप्रकरणी मनपाने पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागवून भोगवटादार कंपनीस जागा वापराकरिता मज्जाव करावा, अशी मागणी आयुक्तांकडे घाणेकर यांनी केली आहे.

बिल एनआरसीच्या नावे कसे?

मी कल्याणकर संस्थेने उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी १८ दिवसांचे आंदोलन नदी पात्रात केले. त्यावेळी ही जागा अदानी उद्योग समूहाने घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मनपाने जप्त केलेली मिळकत अन्य कंपनी कशी वापरू शकते. कामगारांची देणी दिल्याशिवाय या जागेचा वापर अन्य कोणाला करू देता कामा नये. कंपनीची मिळकत अदानीने घेतली असतानाही मनपाने मालमत्ता कराचे बिल ‘एनआरसी’च्या नावाने काढले आहे, ही बाबही आश्चर्यकारक आहे, असे घाणेकर म्हणाले.

----------------