शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. ठाणे शहरही आता पुन्हा तिसऱ्या स्तरात आल्याने सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार अर्थात वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या शहरातील सुमारे ७१५ हॉटेल व्यावसायिकांचे तसेच या व्यवसायात गुंतलेल्या सुमारे हजारो कर्मचाऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच, शिवाय ठाणेकरांना आपला वीकेंड पुन्हा एकदा घरातच घालवावा लागणार आहे.

राज्य सरकारने डेल्टाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेदेखील अध्यादेश काढून काय सुरू राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी हॉटेल पूर्णपणे बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. निर्बंध पुन्हा कठोर केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरून कामासाठी आणले आहे. काही कामगार तर दोन दिवसांपूर्वीच आले आहेत. आता गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इतर व्यवसाय योग्य पद्धतीने सुरु आहेत. हॉटेल व्यावसायिकांचा धंदाच दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपारनंतर रात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे. त्यातही आता कुठे व्यवसाय सुरु होत असताना पुन्हा निर्बंध लादल्याने हा व्यवसाय पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स - ७१५

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी -१४,०००

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता

मुळात हॉटेलचा व्यवसाय हा दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहिले तरी त्याचा उत्पन्नाला फटकाच बसणार आहे. हॉटेल सुरू असले तरी बंद असल्यासारखेच असणार आहेत. त्यात इतर खर्च हे करावेच लागणार आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय भविष्यात राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

........

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?आता कुठे आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली होती. एकएक करून कर्मचारी गावावरुन आणला जात होता. त्यात निर्बंध पुन्हा कडक केल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. बँकेचे लोन, कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल आदींसह इतर खर्च हे करावेत लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात हॉटेल पुन्हा सुरु झाल्यास किमान दोन वर्षे सावरण्यासाठी जाणार आहेत.

(प्रीतम सिंग - हॉटेल व्यावसायिक)

सहा महिन्यानंतर आता कुठे आमचा व्यवसाय हळूहळू सुरू होत होता. त्यात आता पुन्हा निर्बंध लादल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहेत. आम्हाला दुपारपासून ते रात्रीपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा राज्य सरकारने द्यावी, तसेच हा व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

मागील वर्षभर काम नसल्याने मी गावालाच होतो. आता कुठे दोनच दिवसांपूर्वी मालकाने मला तिकीट पाठवून बोलावून घेतले आहे. परंतु, मागील वर्षभर काम नसल्याने खूप हलाखीचे दिवस सहन केले आहेत. त्यामुळे आता हाताला काम आल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करेन अशी अपेक्षा होती. परंतु, आता पुन्हा आमचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)

मागील वर्षभर तसे हालच सुरु आहेत. सहा महिने हॉटेल मालकाने पोसले. त्यानंतर गावाला गेलो. पुन्हा लॉकडाऊन शिथिल होण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गावावरुन आलो. कामाला लागलो, पण आता पुन्हा निर्बंध कडक केल्याने पुन्हा आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)