शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. ठाणे शहरही आता पुन्हा तिसऱ्या स्तरात आल्याने सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार अर्थात वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या शहरातील सुमारे ७१५ हॉटेल व्यावसायिकांचे तसेच या व्यवसायात गुंतलेल्या सुमारे हजारो कर्मचाऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच, शिवाय ठाणेकरांना आपला वीकेंड पुन्हा एकदा घरातच घालवावा लागणार आहे.

राज्य सरकारने डेल्टाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेदेखील अध्यादेश काढून काय सुरू राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी हॉटेल पूर्णपणे बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. निर्बंध पुन्हा कठोर केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरून कामासाठी आणले आहे. काही कामगार तर दोन दिवसांपूर्वीच आले आहेत. आता गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इतर व्यवसाय योग्य पद्धतीने सुरु आहेत. हॉटेल व्यावसायिकांचा धंदाच दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपारनंतर रात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे. त्यातही आता कुठे व्यवसाय सुरु होत असताना पुन्हा निर्बंध लादल्याने हा व्यवसाय पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स - ७१५

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी -१४,०००

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता

मुळात हॉटेलचा व्यवसाय हा दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहिले तरी त्याचा उत्पन्नाला फटकाच बसणार आहे. हॉटेल सुरू असले तरी बंद असल्यासारखेच असणार आहेत. त्यात इतर खर्च हे करावेच लागणार आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय भविष्यात राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

........

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?आता कुठे आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली होती. एकएक करून कर्मचारी गावावरुन आणला जात होता. त्यात निर्बंध पुन्हा कडक केल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. बँकेचे लोन, कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल आदींसह इतर खर्च हे करावेत लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात हॉटेल पुन्हा सुरु झाल्यास किमान दोन वर्षे सावरण्यासाठी जाणार आहेत.

(प्रीतम सिंग - हॉटेल व्यावसायिक)

सहा महिन्यानंतर आता कुठे आमचा व्यवसाय हळूहळू सुरू होत होता. त्यात आता पुन्हा निर्बंध लादल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहेत. आम्हाला दुपारपासून ते रात्रीपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा राज्य सरकारने द्यावी, तसेच हा व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

मागील वर्षभर काम नसल्याने मी गावालाच होतो. आता कुठे दोनच दिवसांपूर्वी मालकाने मला तिकीट पाठवून बोलावून घेतले आहे. परंतु, मागील वर्षभर काम नसल्याने खूप हलाखीचे दिवस सहन केले आहेत. त्यामुळे आता हाताला काम आल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करेन अशी अपेक्षा होती. परंतु, आता पुन्हा आमचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)

मागील वर्षभर तसे हालच सुरु आहेत. सहा महिने हॉटेल मालकाने पोसले. त्यानंतर गावाला गेलो. पुन्हा लॉकडाऊन शिथिल होण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गावावरुन आलो. कामाला लागलो, पण आता पुन्हा निर्बंध कडक केल्याने पुन्हा आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)