शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : डेल्टा विषाणूमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वीकेंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली आहे. पूर्वीप्रमाणे केवळ होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. ठाणे शहरही आता पुन्हा तिसऱ्या स्तरात आल्याने सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार अर्थात वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेल्या शहरातील सुमारे ७१५ हॉटेल व्यावसायिकांचे तसेच या व्यवसायात गुंतलेल्या सुमारे हजारो कर्मचाऱ्यांचे नुकसान तर होणार आहेच, शिवाय ठाणेकरांना आपला वीकेंड पुन्हा एकदा घरातच घालवावा लागणार आहे.

राज्य सरकारने डेल्टाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेदेखील अध्यादेश काढून काय सुरू राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी हॉटेल पूर्णपणे बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. निर्बंध पुन्हा कठोर केल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरून कामासाठी आणले आहे. काही कामगार तर दोन दिवसांपूर्वीच आले आहेत. आता गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इतर व्यवसाय योग्य पद्धतीने सुरु आहेत. हॉटेल व्यावसायिकांचा धंदाच दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपारनंतर रात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल असोसिएशनने केली आहे. त्यातही आता कुठे व्यवसाय सुरु होत असताना पुन्हा निर्बंध लादल्याने हा व्यवसाय पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी पुढील दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स - ७१५

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी -१४,०००

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता

मुळात हॉटेलचा व्यवसाय हा दुपारनंतर सुरू होत असतो. त्यामुळे ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरू राहिले तरी त्याचा उत्पन्नाला फटकाच बसणार आहे. हॉटेल सुरू असले तरी बंद असल्यासारखेच असणार आहेत. त्यात इतर खर्च हे करावेच लागणार आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय भविष्यात राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

........

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?आता कुठे आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली होती. एकएक करून कर्मचारी गावावरुन आणला जात होता. त्यात निर्बंध पुन्हा कडक केल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. बँकेचे लोन, कर्मचाऱ्यांचा पगार, लाईट बिल आदींसह इतर खर्च हे करावेत लागणार आहेत. त्यामुळे भविष्यात हॉटेल पुन्हा सुरु झाल्यास किमान दोन वर्षे सावरण्यासाठी जाणार आहेत.

(प्रीतम सिंग - हॉटेल व्यावसायिक)

सहा महिन्यानंतर आता कुठे आमचा व्यवसाय हळूहळू सुरू होत होता. त्यात आता पुन्हा निर्बंध लादल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होणार आहेत. आम्हाला दुपारपासून ते रात्रीपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा राज्य सरकारने द्यावी, तसेच हा व्यवसाय पुन्हा सावरण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

मागील वर्षभर काम नसल्याने मी गावालाच होतो. आता कुठे दोनच दिवसांपूर्वी मालकाने मला तिकीट पाठवून बोलावून घेतले आहे. परंतु, मागील वर्षभर काम नसल्याने खूप हलाखीचे दिवस सहन केले आहेत. त्यामुळे आता हाताला काम आल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करेन अशी अपेक्षा होती. परंतु, आता पुन्हा आमचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)

मागील वर्षभर तसे हालच सुरु आहेत. सहा महिने हॉटेल मालकाने पोसले. त्यानंतर गावाला गेलो. पुन्हा लॉकडाऊन शिथिल होण्याची वाट पाहत होतो. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी गावावरुन आलो. कामाला लागलो, पण आता पुन्हा निर्बंध कडक केल्याने पुन्हा आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांचे हालच होणार आहेत.

(एक कामगार)