शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आता बदलापूरकरांसाठी हक्काचे जलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, ...

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, खरवई परिसरात उभारलेल्या साडेसात एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन बुधवारी आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते करण्यात आले.

बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम कराव येथे सुरू होते. मात्र ते पूर्ण होण्यास विलंब लागत होता. त्यामुळे आमदार कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाला १५ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्राधिकरणाने या कामाला वेग दिल्याने २५ ऑगस्टला त्याचे केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बदलापूर शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय भोईर, माजी नगराध्यक्ष व गटनेते राजेंद्र घोरपडे, जिल्हा चिटणीस प्रशांत कुलकर्णी, नगरसेवक शरद तेली नगरसेवक रमेश सोळसे उपस्थित होते.

........

अंबरनाथ-बदलापूरसाठी स्वतंत्र व्यवस्था

बॅरेज धरणावरील जलशुद्धीकरण केंद्रातून अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. आता खरवई येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र झाल्याने बदलापूरला स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्राचा अप्रत्यक्ष फायदा अंबरनाथ शहरालादेखील होणार आहे. बॅरेज धरणमध्ये जलशुद्धीकरण केल्यानंतर अंबरनाथसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा आणि बदलापूरसाठी बॅरेज व खरवाई येथून स्वतंत्र पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

-------------