शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

...आता सक्ती एमएससीआयटीची!

By admin | Updated: January 12, 2017 07:12 IST

केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा सक्तीची केली असतानाच आता

कल्याण : केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा सक्तीची केली असतानाच आता अन्य एका परिपत्रकात एमएससीआयटीची परीक्षा बंधनकारक केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास वेतनवाढ रोखण्यात येईल, असा फतवा प्रशासनाने काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार करून हा निर्णय अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे. केडीएमसीतील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम २०१३ पासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, तत्पूर्वी सरकारने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संगणक हाताळणी तसेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे, असे आदेश वेळोवेळी दिले. असे असताना याची माहिती महासभेच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. परंतु, आता एमएससीआयटीची सक्ती करून वेतनवाढ रोखण्याचा दिलेला इशारा अन्यायकारक आहे, याकडे कर्मचारी संघटनेने आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. एमएससीआयटी उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची १ जानेवारी २००८ पासूनची वेतनवाढ रोखून ठेवू, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. यावर, कर्मचारी संघटनेने ज्या वेळी २०१३ मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करताना महासभेची मान्यता घेतली, त्या वेळी एमएससीआयटीची मान्यता घेणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)