शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

एनआरसी कामगार वसाहत पाडकामप्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतींमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने ॲड. ...

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतींमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने ॲड. रोनिता भट्टाचार्य यांनी पोलीस, महापालिका, अदानी कंपनी, लवादाचे मध्यस्थ यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. पाडकाम करताना वसाहतीमधील धोकादायक झालेल्या घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का, असा प्रश्न कामगार संघटनेने उपस्थित केला आहे.

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे असते. याबाबतची नोटीस केडीएमसीने कामगार वसाहतींमधील इमारतींवर लावलेली नसताना अदानी कंपनीकडून पाडकाम कशाच्या आधारे केले जात आहे, असा प्रश्न ऑल इंडिया इंडस्ट्रियल जनरल वर्कर्स युनियनचे सचिव उदय चौधरी यांनी केला आहे. याशिवाय कंपनीने मालमत्ताकराची थकबाकी भरलेली नाही, तरीही पाडकामास महापालिकेची परवानगी कशी दिली, असा प्रश्न संघटनेने विचारला आहे.

एखादी कंपनी बंद झाल्यावर कामगार शेवटचा पगार किती घेतो, याआधारे त्याला देणी दिली जातात. एनआरसी कंपनीत २००९ मध्ये टाळेबंदी झाली. त्यावेळी कामगारांना अर्धा पगार दिला होता. त्यामुळे कंपनी बंद केव्हा झाली, या प्रकरणी औद्योगिक न्यायालयात कामगारांच्या थकीत देण्याची याचिका न्यायप्रविष्ट आहे. एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने सप्टेंबर २०२० मध्ये व्यवस्थापनाचा काहीच संबंध नाही, अशी नोटीस लावली. त्यामुळे २००९ ते सप्टेंबर २०२० दरम्यानची थकीत देण्याची जबाबदारी एनआरसी कंपनीची आहे. ‘कंपनी व्यवस्थापनाचा संबंध नाही’, अशी नोटीस त्यांनी कंपनी बंद झाली त्याचवेळी लावली पाहिजे, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.

काही कामगारांनी स्वीकारले पैसे?

- नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने १०० कोटी रुपयांची देणी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही रक्कम घेण्यास कामगार तयार नाहीत. या प्रकरणी लवादाच्या दिल्ली कार्यालयाकडे याचिका दाखल केली आहे.

- १०० कोटी रुपये अदानींने भरले आहेत. चार हजार कामगारांपैकी काही कामगारांकडून पैसे स्वीकारले जात असल्याने कोणताही विरोध नाही. त्यामुळे केस कशाला चालविता, असे लवादाच्या दिल्ली विभागाकडे अदानी समूहाकडून सांगितले जाऊ शकते, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.

----------------------