शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

एनआरसी कामगार वसाहत पाडकामप्रकरणी नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:55 IST

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतींमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने ॲड. ...

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगार वसाहतींमधील घरे पाडण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने ॲड. रोनिता भट्टाचार्य यांनी पोलीस, महापालिका, अदानी कंपनी, लवादाचे मध्यस्थ यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. पाडकाम करताना वसाहतीमधील धोकादायक झालेल्या घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का, असा प्रश्न कामगार संघटनेने उपस्थित केला आहे.

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे असते. याबाबतची नोटीस केडीएमसीने कामगार वसाहतींमधील इमारतींवर लावलेली नसताना अदानी कंपनीकडून पाडकाम कशाच्या आधारे केले जात आहे, असा प्रश्न ऑल इंडिया इंडस्ट्रियल जनरल वर्कर्स युनियनचे सचिव उदय चौधरी यांनी केला आहे. याशिवाय कंपनीने मालमत्ताकराची थकबाकी भरलेली नाही, तरीही पाडकामास महापालिकेची परवानगी कशी दिली, असा प्रश्न संघटनेने विचारला आहे.

एखादी कंपनी बंद झाल्यावर कामगार शेवटचा पगार किती घेतो, याआधारे त्याला देणी दिली जातात. एनआरसी कंपनीत २००९ मध्ये टाळेबंदी झाली. त्यावेळी कामगारांना अर्धा पगार दिला होता. त्यामुळे कंपनी बंद केव्हा झाली, या प्रकरणी औद्योगिक न्यायालयात कामगारांच्या थकीत देण्याची याचिका न्यायप्रविष्ट आहे. एनआरसी कंपनी व्यवस्थापनाने सप्टेंबर २०२० मध्ये व्यवस्थापनाचा काहीच संबंध नाही, अशी नोटीस लावली. त्यामुळे २००९ ते सप्टेंबर २०२० दरम्यानची थकीत देण्याची जबाबदारी एनआरसी कंपनीची आहे. ‘कंपनी व्यवस्थापनाचा संबंध नाही’, अशी नोटीस त्यांनी कंपनी बंद झाली त्याचवेळी लावली पाहिजे, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.

काही कामगारांनी स्वीकारले पैसे?

- नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने १०० कोटी रुपयांची देणी देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ही रक्कम घेण्यास कामगार तयार नाहीत. या प्रकरणी लवादाच्या दिल्ली कार्यालयाकडे याचिका दाखल केली आहे.

- १०० कोटी रुपये अदानींने भरले आहेत. चार हजार कामगारांपैकी काही कामगारांकडून पैसे स्वीकारले जात असल्याने कोणताही विरोध नाही. त्यामुळे केस कशाला चालविता, असे लवादाच्या दिल्ली विभागाकडे अदानी समूहाकडून सांगितले जाऊ शकते, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.

----------------------