शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

उत्तर, दक्षिण भारतात जाणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे, प्रवास करणे टाळावे, असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे, प्रवास करणे टाळावे, असे आवाहन राज्य, केंद्र सरकार करत असतानाही मुंबईतून उत्तर, दक्षिण भारतात तसेच कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली आहेत. शाळा-महाविद्यालयांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अगोदरच रेल्वे तिकिटांचे आरक्षण काढले आहे. त्यामुळे आताच मे महिन्यापर्यंतच्या बहुतांशी गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे. गावी जाण्याची ओढ असल्याने नागरिक वेटिंगवर तिकिटे काढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे भय कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे तेव्हापासून मेल-एक्स्प्रेस गाड्या सामान्य प्रवाशांसाठी बंद होत्या. त्यामुळे तेव्हा गावाला जाता आले नाही. शिवाय बहुतांशी शाळा बंद आहेत. तसेच परीक्षाही ऑनलाइन होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, अनेकांनी यंदा गावी जाण्याचा बेत आखला आहे. त्यातही रेल्वेचा प्रवास तुलनेने स्वस्त आणि वेळ वाचवणारा असल्याने रेल्वेने प्रवास करण्याचा कल अधिक दिसून येत आहे.

सध्याचा उन्हाळा विचारात घेता दिवसा प्रवास करण्यापेक्षा रात्रीच्या प्रवासाला अनेक जण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मुंबईतून रात्री सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण फुल्ल असल्याचे निदर्शनास येत आहे. दुसरीकडे मागील वर्षी अनेकांनी रेल्वे सुरू नसल्याने रस्ते मार्गाने मिळेल त्या वाहनाने गाव गाठले होते. या खडतर प्रवासाच्या अनेकांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यामुळे या वेळी आधीच आरक्षण करून नियमानुसार कोविड टेस्ट, शक्य झाल्यास लसीकरण आदी करून प्रवास करण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले.

लग्नसराईनिमित्तही प्रवास

- उत्तर भारतातील वाराणसी, लखनऊ, अलाहाबाद, दरभंगा, पाटणा, मुझफ्फर तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आरक्षणे मुंबई येथूनच फुल्ल असल्याचे निदर्शनास येत आहे. या गाड्या एलटीटी, ठाणे, कल्याण, नाशिकमार्गे पुढे धावतात. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एप्रिल - मे हे महिने लग्नसराईचे असल्याने त्याकरिता गावाला जाणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे.

शिमगोत्सवामुळे तिकिटे आरक्षित

- दक्षिण भारतातील मद्रास, तिरुपती, सोलापूरमार्गे हैदराबाद, लातूर आदी ठिकाणी जाण्यासाठीही बुकिंग झाले आहे. कोकणातही रत्नागिरी, कणकवली, गोवामार्गे बंगलोरला जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या शिमगोत्सवासही अनेक चाकरमानी गेले आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे.

निवडणुकीमुळेही तिकिटे मिळेनात

सध्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुंबई व परिसरातून अनेक चाकरमानी खास निवडणुकीसाठी गावी गेले आहेत. त्यामुळे मार्चपासूनच या राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्यांची तिकिटे फुल्ल झाली आहेत.

--------------