शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नवा रस्ता ४५ वर्षानंतर होणार

By admin | Updated: June 29, 2017 02:37 IST

ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ब्रिटीश राजवटीत बनवलेला मुंबई - आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा -वंजारपट्टीनाका दरम्यानचा रस्ता ४५ वर्षानंतर पुन्हा सिमेंटचा बनवण्यात येणार आहे. यासाठी ४८ कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजूर केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अंजूरफाटा ते वंजारपट्टीनाका हा पाच किलोमीटरचा रस्ता शहरातून जातो. १९७० च्या दरम्यान या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. रस्त्याची वारंवार दुरूस्ती करावी लागत असल्याने तत्कालीन सरकारने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवला. यंत्रमाग उद्योग वाढल्याने या रस्त्यावरील जडवाहनांची वर्दळ वाढली. १९९२ च्या दरम्यान हा रस्ता नगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतला. पालिकेने आजतागायत या रस्त्यासाठी कोट्यवधी खर्चूनही रस्त्यामधील चढउतार कमी करता आले नाही. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी साठेआठ कोटी खर्चून पुन्हा हा रस्ता बनवण्यात आला. मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराने पुन्हा या मार्गावर खड्डे पडून वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागले. तसेच रात्रीच्यावेळी नारपोली व शहर वाहतूक पोलीस अवजड वाहने या शहरातील रस्त्यावरून पाठवत असल्याने त्याचा परिणामही रस्त्यावर होत होता. मात्र याबाबत पालिका प्रशासन व नगरसेवकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तर महापालिकेकडे पैसे नसल्यामुळे काम करता येत नव्हते. त्यामुळे या मार्गावरून नियमित जाणाऱ्या नागरिकांच्या,विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तक्रारी वाढल्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासाठी ४८ कोटी ३१ लाखाचा निधी मंजूर केल्याने नव्याने या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले आहे.