शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या पूर नियंत्रण रेषांची नव्याने चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

बदलापूर : बदलापूर शहरातील पुराची परिस्थिती पाहता दोन वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नव्याने जाहीर केलेल्या पूर नियंत्रण रेषेवर आता चर्चा ...

बदलापूर : बदलापूर शहरातील पुराची परिस्थिती पाहता दोन वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नव्याने जाहीर केलेल्या पूर नियंत्रण रेषेवर आता चर्चा सुरू झाली आहे. उल्हास नदीपात्रापासून पूर नियंत्रण रेषा शहराच्या दिशेने वाढविण्यात आल्याने त्याला राजकीय आणि बांधकाम व्यावसायिकांनी विरोध केला होता. मात्र पुन्हा पुराचा फटका बसल्याने आता पूर नियंत्रण रेषा योग्य असल्याची चर्चा रंगली आहे.

२०२० मध्ये लघू पाटबंधारे विभागाने पूर नियंत्रण रेषा जाहीर केली आहे. आतापर्यंत आलेल्या पुराचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने ही पूर नियंत्रण रेषा निश्चित केली आहे. मात्र पूरनियंत्रण रेषा निश्चित करताना त्या ठिकाणी नव्याने विकसित होणाऱ्यांना कोणती संधी उपलब्ध झालेली नाही. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जुन्या इमारतींबाबत पुनर्विकास करण्यासाठी अटी आणि शर्ती निश्चित केल्याने भविष्यात उल्हास नदीच्या काठावर असलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्याशिवाय या भागात होणारी आर्थिक हानी टाळता येणार नाही.

बदलापूर शहरातील पूर नियंत्रण रेषेला नागरिकांपेक्षा बांधकाम व्यावसायिकांचा विरोध जास्त असल्याने त्या विरोधाला शासन जुमानेल असे सद्य:स्थितीत तरी वाटत नाही. पूर नियंत्रण रेषेबाबत बदलापूरकरांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात पुराच्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती पाहता नदीकाठावर असलेल्या इमारती आणि नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींनी याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मंगळवारी पूर नियंत्रण रेषेबाबत मंत्रालयात बैठक सुरू असताना लगेच दुसऱ्या दिवशीपासून बदलापूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर नियंत्रण रेषांबाबत शासन सहानुभूतिपूर्वक विचार करण्याच्या मानसिकतेत असतानाच पुन्हा पुराचा फटका बसल्याने आता शासन यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

-----------