शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बदलापूरच्या पूर नियंत्रण रेषांची नव्याने चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

बदलापूर : बदलापूर शहरातील पुराची परिस्थिती पाहता दोन वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नव्याने जाहीर केलेल्या पूर नियंत्रण रेषेवर आता चर्चा ...

बदलापूर : बदलापूर शहरातील पुराची परिस्थिती पाहता दोन वर्षांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाने नव्याने जाहीर केलेल्या पूर नियंत्रण रेषेवर आता चर्चा सुरू झाली आहे. उल्हास नदीपात्रापासून पूर नियंत्रण रेषा शहराच्या दिशेने वाढविण्यात आल्याने त्याला राजकीय आणि बांधकाम व्यावसायिकांनी विरोध केला होता. मात्र पुन्हा पुराचा फटका बसल्याने आता पूर नियंत्रण रेषा योग्य असल्याची चर्चा रंगली आहे.

२०२० मध्ये लघू पाटबंधारे विभागाने पूर नियंत्रण रेषा जाहीर केली आहे. आतापर्यंत आलेल्या पुराचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाने ही पूर नियंत्रण रेषा निश्चित केली आहे. मात्र पूरनियंत्रण रेषा निश्चित करताना त्या ठिकाणी नव्याने विकसित होणाऱ्यांना कोणती संधी उपलब्ध झालेली नाही. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जुन्या इमारतींबाबत पुनर्विकास करण्यासाठी अटी आणि शर्ती निश्चित केल्याने भविष्यात उल्हास नदीच्या काठावर असलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्याशिवाय या भागात होणारी आर्थिक हानी टाळता येणार नाही.

बदलापूर शहरातील पूर नियंत्रण रेषेला नागरिकांपेक्षा बांधकाम व्यावसायिकांचा विरोध जास्त असल्याने त्या विरोधाला शासन जुमानेल असे सद्य:स्थितीत तरी वाटत नाही. पूर नियंत्रण रेषेबाबत बदलापूरकरांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात असला तरी प्रत्यक्षात पुराच्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती पाहता नदीकाठावर असलेल्या इमारती आणि नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींनी याबाबत ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मंगळवारी पूर नियंत्रण रेषेबाबत मंत्रालयात बैठक सुरू असताना लगेच दुसऱ्या दिवशीपासून बदलापूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पूर नियंत्रण रेषांबाबत शासन सहानुभूतिपूर्वक विचार करण्याच्या मानसिकतेत असतानाच पुन्हा पुराचा फटका बसल्याने आता शासन यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

-----------