शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

एमआरटीपी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची

By admin | Updated: November 16, 2015 02:08 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या महिनाभरात अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या महिनाभरात अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अशा बांधकामांचा वेग मंदावला आहे. गेल्या सहा वर्षांत हे प्रथमच घडत आहे. अशा बांधकामांना राजकीय मंडळीचे संरक्षण मिळत गेल्यामुळे प्रभावी कारवाई होत नव्हती. वास्तविक, या मोहिमेसमवेत आयुक्तांनी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवक तसेच राजकारणी मंडळींवर कारवाईचा बडगा उगारायला हवा, तरच अशा गैरप्रकाराला आळा बसू शकेल.ही बांधकामे तोडताना वीज व पाणी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना नियमानुसार या जोडण्या घेण्यासाठी संबंधित विभागामध्ये अनेक खेटे मारावे लागत असतात. परंतु, अशी बांधकामे करणाऱ्या समाजकंटकांना या सुविधा सहजरीत्या उपलब्ध होतात. यामागे फार मोठे अर्थकारण आहे. समाजकंटक, अधिकारी व राजकारणी अशी जी साखळी तयार झाली आहे, ती तोडण्यासाठी प्रशासनाने क्षेत्र एमआरटीपी कायद्याची प्रभावीरीत्या अंमलबजावणी केली पाहिजे. जोवर या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होत नाही, तोवर हे गैरप्रकार थांबणे कठीण आहे.अनधिकृत बांधकामे करणाऱ्या चार ते पाच चाळमाफियांवर या कायद्यांतर्गत कारवाई झाली तरच ही मंडळी पुन्हा भविष्यात धाडस करणार नाहीत. ही बांधकामे जमीनदोस्त झालीच पाहिजे. परंतु, त्याचबरोबर कायद्याचा बडगा काय असतो, हे या चाळमाफियांना कळायला हवे. वन, शासकीय व गोरगरीब आदिवासी समाजाच्या जमिनी हडप करणारे हे चाळमाफिया मोकाट सुटणे, हे न्यायाला धरून होणार नाही. त्यांच्यासमवेत वीज व पाणी देणाऱ्या महावितरण व मनपाच्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. तरच, खऱ्या अर्थाने करदात्यांना न्याय मिळू शकेल. प्रामाणिकपणे कर भरूनही करदात्याला पाण्यापासून वंचित राहावे लागते. औद्योगिक क्षेत्रातही अनेक उद्योजकांनी बेकायदेशीररीत्या नळजोडण्या घेतल्या आहेत. या सर्व गैरप्रकारामागे स्थानिक नगरसेवकांचा हात आहे. मनपा प्रशासनाने या नळजोडण्या त्वरित खंडित करणे गरजेचे आहे. नागरी वसाहतीला दोन ते तीन दिवस पाणी मिळत नाही. तर, दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रामध्ये अनधिकृत नळजोडण्यांचा सुळसुळाट हे चित्र बदलण्यासाठी मनपाने खंबीर धोरण आखले पाहिजे.