शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

एमआरटीपी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची

By admin | Updated: November 16, 2015 02:08 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या महिनाभरात अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या महिनाभरात अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे अशा बांधकामांचा वेग मंदावला आहे. गेल्या सहा वर्षांत हे प्रथमच घडत आहे. अशा बांधकामांना राजकीय मंडळीचे संरक्षण मिळत गेल्यामुळे प्रभावी कारवाई होत नव्हती. वास्तविक, या मोहिमेसमवेत आयुक्तांनी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेवक तसेच राजकारणी मंडळींवर कारवाईचा बडगा उगारायला हवा, तरच अशा गैरप्रकाराला आळा बसू शकेल.ही बांधकामे तोडताना वीज व पाणी देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना नियमानुसार या जोडण्या घेण्यासाठी संबंधित विभागामध्ये अनेक खेटे मारावे लागत असतात. परंतु, अशी बांधकामे करणाऱ्या समाजकंटकांना या सुविधा सहजरीत्या उपलब्ध होतात. यामागे फार मोठे अर्थकारण आहे. समाजकंटक, अधिकारी व राजकारणी अशी जी साखळी तयार झाली आहे, ती तोडण्यासाठी प्रशासनाने क्षेत्र एमआरटीपी कायद्याची प्रभावीरीत्या अंमलबजावणी केली पाहिजे. जोवर या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होत नाही, तोवर हे गैरप्रकार थांबणे कठीण आहे.अनधिकृत बांधकामे करणाऱ्या चार ते पाच चाळमाफियांवर या कायद्यांतर्गत कारवाई झाली तरच ही मंडळी पुन्हा भविष्यात धाडस करणार नाहीत. ही बांधकामे जमीनदोस्त झालीच पाहिजे. परंतु, त्याचबरोबर कायद्याचा बडगा काय असतो, हे या चाळमाफियांना कळायला हवे. वन, शासकीय व गोरगरीब आदिवासी समाजाच्या जमिनी हडप करणारे हे चाळमाफिया मोकाट सुटणे, हे न्यायाला धरून होणार नाही. त्यांच्यासमवेत वीज व पाणी देणाऱ्या महावितरण व मनपाच्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. तरच, खऱ्या अर्थाने करदात्यांना न्याय मिळू शकेल. प्रामाणिकपणे कर भरूनही करदात्याला पाण्यापासून वंचित राहावे लागते. औद्योगिक क्षेत्रातही अनेक उद्योजकांनी बेकायदेशीररीत्या नळजोडण्या घेतल्या आहेत. या सर्व गैरप्रकारामागे स्थानिक नगरसेवकांचा हात आहे. मनपा प्रशासनाने या नळजोडण्या त्वरित खंडित करणे गरजेचे आहे. नागरी वसाहतीला दोन ते तीन दिवस पाणी मिळत नाही. तर, दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रामध्ये अनधिकृत नळजोडण्यांचा सुळसुळाट हे चित्र बदलण्यासाठी मनपाने खंबीर धोरण आखले पाहिजे.