शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गायकवाड यांच्यासाठी राष्ट्रवादी सरसावली!

By admin | Updated: April 1, 2016 03:05 IST

जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या कारभारावर नाराजी दाखवत आमदारकीचा राजीनामा देऊ करणारे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र

डोंबिवली : जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या कारभारावर नाराजी दाखवत आमदारकीचा राजीनामा देऊ करणारे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी संपर्क केलेला नाही. मात्र, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी गायकवाड यांची समजूत काढण्याकरिता हालचाली सुरू केल्या आहेत. रुसलेल्या गायकवाडांनी विधिमंडळ अधिवेशनाकडे पाठ फिरवली असली तरी अजून सत्ताधारी भाजपाने गायकवाड यांच्या नाराजीची थेट दखल घेतलेली नाही. जोशी यांनी रेतीमाफियांपासून वेगवेगळ्या प्रकरणांत कारवाई केल्याने गायकवाड यांच्या दबावापोटी जोशी यांना पदावरून दूर केले तर लोकांमध्ये नाराजी वाढीस लागेल, अशी भीती भाजपाला वाटते. यापूर्वी व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आणि ई. रवींद्रन यांच्या बदलीच्या चर्चांनीही नाराजीचे सूर उमटले होते. त्यामुळे गायकवाड यांची नाराजी दूर करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखरे, प्रमोद हिंदुराव आणि आर.सी. पाटील यांनी फोन करून टोकाचे पाऊल न उचलण्याचा सल्ला गायकवाड यांना दिला. आपण तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊ, असे डावखरे यांनी म्हटले आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य टाळले असून मुख्यमंत्र्यांनीही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही अथवा प्रतिक्रिया दिलेली नाही. (प्रतिनिधी) भिवंडीतील बेकायदा गोदामांवर जोशी यांनी कारवाई केली, तेव्हा खासदार कपिल पाटील यांनीही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांना फडणवीस यांचाच पाठिंबा असल्याची चर्चा ठाण्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात आहे.गायकवाड यांनी राजीनामा देणे योग्य नाही. जर ते माझ्याकडे आले तर त्यांना मी मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. जनतेने निवडून दिले असल्याने त्यांनी असा निर्णय घेणे अपेक्षित नाही. त्यासंदर्भात त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. - वसंत डावखरे, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीआमदार गायकवाड हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी असे विचलीत निर्णय घेऊ नये. पंतप्रधान मोदीलाटेतही ते निवडून आले आहेत. याचा अर्थ त्यांना जनाधार असून त्यांनी विशिष्ट गोष्टींसाठी राजीनामा न देता कायद्याच्या चौकटीत राहून लढा द्यावा. जनतेने त्यांना निवडून दिले आहे. याचा विचार करावा. - प्रमोद हिंदुराव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी