शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
4
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
5
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
6
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
7
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
8
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
9
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
10
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
11
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
12
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
13
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
14
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
15
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
16
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
17
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
18
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
19
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
20
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नारनवरेंनी पदाची सूत्रे स्वीकारली

By admin | Updated: May 8, 2017 05:51 IST

पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी

लोकमत न्युज नेटवर्कपालघर : पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी त्याचे स्वागत केले.पालघरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून झाल्यानंतर त्यांच्या जागी उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र प्रशिक्षणासाठी ते मसुरी येथे गेल्याने अप्पर जिल्हाधिकारी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. काल संध्याकाळी डॉ.नारनवरे हे कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.डॉ. नारनवरे हे डेन्टींस्ट असून त्यांनी सायकोथेरपी आणि पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारतीय प्रशासन सेवेच्या २००९ च्या बॅचचे अधिकारी असून सामाजिक विकासाची प्रचंड आवडीतून त्यांनी केलेल्या कामांची दखल राज्यानेच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यानेही घेतलेली आहे. जलसंवर्धन हा त्यांचा आवडता विषय आहे. जलयुक्त शिवारचा त्यांचा उस्मानाबाद पॅटर्न सर्वत्र प्रसिद्ध असून त्याचे श्रेय डॉ.नारनवरे यांच्याकडे जाते. त्यांच्या कामांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली असून स्थानपरत्वे काही बदल करून राजस्थान सरकारने हा पॅटर्न स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे क्लस्टर (गट) तयार करणे, तरु णांत शेती प्रक्रियेबाबत व विक्रीबाबत आवड निर्माण करणे, यात त्यांना विशेष गती आहे. ऊसा पलीकडे जाऊन शेतीक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीत कृषी क्र ांती प्रकल्पाद्वारे त्यांनी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडविला. त्यांनी शेतकऱ्यांना सामुदायिक शेती साठी प्रोत्साहित केले. तब्बल १४ हजार ६०० शेतकऱ््यांचे गट व ५६ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ््यांना या धाग्यात जोडण्याचे काम केले.सांगली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ग्रामीण विकास कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०१३ मध्ये त्यांना यशवंत पंचायतराज अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले होते.तर गेल्यावर्षी नागरी सेवा दिनी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा गौरव झाला. केंद्रीय ग्रामीण विकास विभागा तर्फे २०१६ मध्ये त्यांना चॅम्पियन आॅफिसर म्हणून आमंत्रित करण्यात आले. २२ राज्यातील निवडक २५ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा त्यात समावेश होता. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीकडे जिल्हा अपेक्षेने पहातो आहे.