शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नारनवरेंनी पदाची सूत्रे स्वीकारली

By admin | Updated: May 8, 2017 05:51 IST

पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी

लोकमत न्युज नेटवर्कपालघर : पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.प्रशांत नारनवरे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सतीश देशमुख यांनी त्याचे स्वागत केले.पालघरचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून झाल्यानंतर त्यांच्या जागी उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र प्रशिक्षणासाठी ते मसुरी येथे गेल्याने अप्पर जिल्हाधिकारी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. काल संध्याकाळी डॉ.नारनवरे हे कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.डॉ. नारनवरे हे डेन्टींस्ट असून त्यांनी सायकोथेरपी आणि पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारतीय प्रशासन सेवेच्या २००९ च्या बॅचचे अधिकारी असून सामाजिक विकासाची प्रचंड आवडीतून त्यांनी केलेल्या कामांची दखल राज्यानेच नव्हे तर राजस्थानसारख्या राज्यानेही घेतलेली आहे. जलसंवर्धन हा त्यांचा आवडता विषय आहे. जलयुक्त शिवारचा त्यांचा उस्मानाबाद पॅटर्न सर्वत्र प्रसिद्ध असून त्याचे श्रेय डॉ.नारनवरे यांच्याकडे जाते. त्यांच्या कामांची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली असून स्थानपरत्वे काही बदल करून राजस्थान सरकारने हा पॅटर्न स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे क्लस्टर (गट) तयार करणे, तरु णांत शेती प्रक्रियेबाबत व विक्रीबाबत आवड निर्माण करणे, यात त्यांना विशेष गती आहे. ऊसा पलीकडे जाऊन शेतीक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीत कृषी क्र ांती प्रकल्पाद्वारे त्यांनी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडविला. त्यांनी शेतकऱ्यांना सामुदायिक शेती साठी प्रोत्साहित केले. तब्बल १४ हजार ६०० शेतकऱ््यांचे गट व ५६ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ््यांना या धाग्यात जोडण्याचे काम केले.सांगली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन ग्रामीण विकास कामात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन २०१३ मध्ये त्यांना यशवंत पंचायतराज अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले होते.तर गेल्यावर्षी नागरी सेवा दिनी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा गौरव झाला. केंद्रीय ग्रामीण विकास विभागा तर्फे २०१६ मध्ये त्यांना चॅम्पियन आॅफिसर म्हणून आमंत्रित करण्यात आले. २२ राज्यातील निवडक २५ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा त्यात समावेश होता. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीकडे जिल्हा अपेक्षेने पहातो आहे.