शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

बाप्पांचे ऑनलाइन दर्शन नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

उल्हासनगर : गणेशोत्सव साजरा करताना बहुतांश गणेश मंडळांनी साधीच सजावट केल्याचे चित्र शहरात असले, तरी उत्साहात थोडीही कमतरता जाणवत ...

उल्हासनगर : गणेशोत्सव साजरा करताना बहुतांश गणेश मंडळांनी साधीच सजावट केल्याचे चित्र शहरात असले, तरी उत्साहात थोडीही कमतरता जाणवत नाही. गणेश मंडळे व नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असून, बाप्पांच्या ऑनलाइन दर्शनाची सुविधा नावालाच आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

उल्हासनगरात मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जात असून, देखावे व सजावट दरवर्षी एकापेक्षा एक सरस असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षी कोरोनाची बंधने शिथिल झाल्याने गणेश मंडळे व भक्तांत उत्साह संचारला आहे. मात्र, देखावा व सजावट करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार काही मोठ्या गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली असली, तरी अशा मंडळांची संख्या अगदी अल्प आहे. गणेश दर्शनासाठी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी स्वयंसेवक तैनात केले असून, मंडळाबाहेर प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर पावसाची संततधार असल्याने, नागरिक बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणावे तसे बाहेर पडले नाहीत. मात्र, दोन दिवसांत नागरिक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे.

शहरातील गणेश मंडळांनी नियमावली तयार केली असून, भक्तांनी रांगेत उभे राहून विशिष्ट अंतर ठेवून दर्शन घेणे, कोणताही प्रसाद न चढवणे, मंडळाबाहेर ठेवलेल्या सॅनिटायझरचा उपयोग करणे व मास्क घालणे बंधनकारक केले आहे. शहरात कुठेही गणेश मंडळांमध्ये देखावा व सजावटीसाठी चढाओढ नाही. बहुतांश मंडळे कोरोना नियम पाळण्याचा प्रयत्न करीत असले, तरी उत्साहाच्या भरात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. अनेक मंडळांनी कोरोनावर देखावा करून यापासून सुटका करण्याचे साकडे बाप्पाकडे घातले आहे. संभाजी चौक, विठ्ठलवाडी स्टेशन येथील गणपती, कॅम्प नं-५ येथील गणेश मंडळ, संतोषनगर, कॅम्प नं-३ संत कंवाराम पुतळ्याजवळील गणेश मंडळ, कॅम्प नं-४ मुख्य मार्केटमधील उल्हासनगरचा राजा, आदी मंडळाने सामाजिक देखावे केले आहेत.

.............

महापालिका व पोलिसांची करडी नजर

महापालिका प्रशासन व शहर पोलिसांची गणेश मंडळांवर करडी नजर आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये, म्हणून महापालिका आयुक्त व पोलीस उपायुक्त यांनी गणेश मंडळ पदाधिकारी, समाजसेवक, राजकीय नेते यांची बैठक घेऊन खबरदारी घेण्याचे सुचविले आहे. यावर्षी नदी, तलाव, आदी ठिकाणी बाप्पांचे विसर्जन करण्यास महापालिकेने मनाई केली असून, विविध ठिकाणी महापालिकेने मूर्ती संकलन केंद्र उघडले आहे.