शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

नारिवलीच्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे ...

मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे लाखो रुपये वाया गेले, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुर्गम भागातील गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभलेला नसताना त्या गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला. या गावांमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. यानिमित्ताने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करूनही घेतला. कोणतीही ऐतिहासिक नोंद नसताना दुर्गम भागातील नारिवली, कळभांड, वैशाखरे, मढ, माळ, वेळूक या गावांना सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. पर्यटनाचा दर्जा देऊन त्या गावात भंगारवाले किंवा फेरीवाले यांच्या व्यतिरिक्त कुणीही फिरकत नाही. त्या गावांत विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. मात्र त्या गावांत दररोज येणाऱ्या पर्यटकांची नोंद होते की नाही याचा विचार मात्र प्रशासनाने केेलेला नाही.

नारिवली येथे चक्क स्मशानभूमीचा कायापालट हा पर्यटन क्षेत्राच्या निधीतून करण्यात आला आहे. स्मशानभूमीतच या पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवारा केंद्र उभारले. मात्र त्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने हे केंद्र म्हणजे तरंगता बंगला वाटत आहे. दरम्यान, या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसतानाही या गावाला सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला कसा? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

-----------------------------------------------------

या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्यास त्याची अभियंत्यांमार्फत पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.

- एस. एम. कांबळे, उपअभियंता