शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

नारिवलीच्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे ...

मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे लाखो रुपये वाया गेले, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुर्गम भागातील गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभलेला नसताना त्या गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला. या गावांमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. यानिमित्ताने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करूनही घेतला. कोणतीही ऐतिहासिक नोंद नसताना दुर्गम भागातील नारिवली, कळभांड, वैशाखरे, मढ, माळ, वेळूक या गावांना सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. पर्यटनाचा दर्जा देऊन त्या गावात भंगारवाले किंवा फेरीवाले यांच्या व्यतिरिक्त कुणीही फिरकत नाही. त्या गावांत विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. मात्र त्या गावांत दररोज येणाऱ्या पर्यटकांची नोंद होते की नाही याचा विचार मात्र प्रशासनाने केेलेला नाही.

नारिवली येथे चक्क स्मशानभूमीचा कायापालट हा पर्यटन क्षेत्राच्या निधीतून करण्यात आला आहे. स्मशानभूमीतच या पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवारा केंद्र उभारले. मात्र त्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने हे केंद्र म्हणजे तरंगता बंगला वाटत आहे. दरम्यान, या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसतानाही या गावाला सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला कसा? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

-----------------------------------------------------

या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्यास त्याची अभियंत्यांमार्फत पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.

- एस. एम. कांबळे, उपअभियंता