शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

नारिवलीच्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे ...

मुरबाड : नारिवली स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने सभोवताली चिखल साचला आहे. यामुळे सरकारचे लाखो रुपये वाया गेले, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने दुर्गम भागातील गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभलेला नसताना त्या गावाला पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेतला. या गावांमध्ये नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. यानिमित्ताने कोट्यवधींचा निधी उपलब्ध करूनही घेतला. कोणतीही ऐतिहासिक नोंद नसताना दुर्गम भागातील नारिवली, कळभांड, वैशाखरे, मढ, माळ, वेळूक या गावांना सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे. पर्यटनाचा दर्जा देऊन त्या गावात भंगारवाले किंवा फेरीवाले यांच्या व्यतिरिक्त कुणीही फिरकत नाही. त्या गावांत विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो. मात्र त्या गावांत दररोज येणाऱ्या पर्यटकांची नोंद होते की नाही याचा विचार मात्र प्रशासनाने केेलेला नाही.

नारिवली येथे चक्क स्मशानभूमीचा कायापालट हा पर्यटन क्षेत्राच्या निधीतून करण्यात आला आहे. स्मशानभूमीतच या पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवारा केंद्र उभारले. मात्र त्या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्याने हे केंद्र म्हणजे तरंगता बंगला वाटत आहे. दरम्यान, या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा नसतानाही या गावाला सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला कसा? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

-----------------------------------------------------

या निवारा केंद्रात नाल्याचे पाणी शिरत असल्यास त्याची अभियंत्यांमार्फत पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.

- एस. एम. कांबळे, उपअभियंता