शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

एसआरए योजनेबाबत पालिका अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भिवंडी शहराला यंत्रमाग नगरी म्हणून देशभर नावलौकिक मिळाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने भिवंडी शहराला यंत्रमाग नगरी म्हणून देशभर नावलौकिक मिळाले आहे. यंत्रमाग उद्योगामुळे भिवंडीत कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आले. सुरुवातीला भाड्याने काही कामगारांनी राहण्यासाठी घरे घेतली तर काहींनी शहरात असलेल्या वन जमिनींसह, देवस्थान त्याचबरोबर मनपाच्या आरक्षित भूखंडांवर झोपड्या बांधल्या. जसजसा शहराचा विस्तार वाढला तसतसा स्थानिक लोकप्रतिनिधी व भूमाफियांनी शहरातील मोकळ्या जागा बळकावल्या व या मोकळ्या जागांवर झोपड्या, चाळी बांधून कामगारांना ही घरे भाडेतत्त्वावर राहायला दिली. मात्र आता या झोपड्यांमुळे शहराची लोकसंख्या वाढली असून महापालिका प्रशासनावर त्याचा ताण पडत आहे. परिणामी शहरातील नागरिकांना अद्ययावत सुविधा पुराविण्याबरोबरच मूलभूत सुविधा पुरविण्यातही शासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

भिवंडीत शांतीनगर, गायत्रीनगर, नागाव या भागात टेकडीवर वसलेली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. त्याचबरोबर कामतघर, फुलेनगर, नवी वस्ती या भागातही मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसली आहे. त्याचबरोबर वंजारपट्टी परिसरातील आमिना नगर, म्हाडा कॉलनी, चव्हाण कॉलनी, संगमपाडा, कोंबडपाडा, ईदगा रोड, अंजूरफाटा, अजमेरनगर, साठेनगर अशा शहराला चहूबाजूंनी वेढलेल्या झोपडपट्ट्या आहेत.

राज्यातील अनेक शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविली जाते. मात्र भिवंडी महापालिकेकडून अजूनही कोणतीही झोपडपट्टी विकास योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत भिवंडी मनपा अनभिज्ञच राहिली आहे. झोपडपट्ट्यांचा विकास होत नसल्याने शहरातील सुविधांचा भार मनपा प्रशासनावर नेहमीच येतो. मात्र महापालिका याकडे आतापर्यंत दुर्लक्ष देत आली आहे. ज्याचा त्रास येथील स्थानिक भिवंडीकरांना होत आहे. त्यामुळे शहरविकासासाठी आता तरी भिवंडी महापालिका झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणार का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात अजून कुठलीही झोपडपट्टी विकास योजना सुरू केलेली नाही, अशी माहिती शहर अभियंता एल. पी. गायकवाड यांनी दिली आहे.