शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालिका विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणच नाही

By admin | Updated: January 9, 2017 07:28 IST

एकीकडे सरकार डिजिटल भारताचे स्वप्न लोकांना दाखवत असताना मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ३५ पालिका शाळांतील

मीरा रोड : एकीकडे सरकार डिजिटल भारताचे स्वप्न लोकांना दाखवत असताना मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ३५ पालिका शाळांतील सुमारे ९ हजार विद्यार्थी महिनाभरापासून संगणक शिक्षणापासून वंचित आहेत. पालिकेने वेळीच निविदा प्रक्रिया राबवली नाही. शिवाय, पर्यायी व्यवस्थादेखील न केल्याने गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांतील या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.मीरा-भार्इंदर शहरांतील ३५ पालिका शाळांमधून सुमारे ९ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू या माध्यमांचा समावेश आहे. पहिली ते आठवीपर्यंत चालणाऱ्या या पालिका शाळांमधून मोफत शिक्षण, वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश मिळत असल्याने आदिवासी, गोरगरिबांसह सर्वसामान्य घरातल्या मुलांचे शिक्षणाचे स्वप्न साकार होत आहे. इतक्या सुविधा तसेच चांगले वेतन शिक्षकांना मिळत असताना पालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे केले जाते, हे सत्य आहे. संगणकाच्या युगात पालिका शाळांतील मुले मागे पडू नयेत, म्हणून एप्रिल २००६ मध्ये महासभेने त्यांना संगणकाचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने घेतला होता. त्या अनुषंगाने पालिकेने पॅन्सी टेक्नॉलॉजीला पालिका शाळांतील मुलांना संगणक शिकवण्यासाठी ५ वर्षांचे कंत्राट दिले होते. संगणकदेखील कंत्राटदारानेच खरेदी करायचे असल्याने पालिकेने प्रत्येक शाळेत संगणक कक्ष तयार करून दिला आहे. प्रतिविद्यार्थी ३५ रुपये याप्रमाणे पालिका कंत्राटदारास संगणक शिकवण्याचे शुल्क देत होती. ५ वर्षांची मुदत संपुष्टात आल्यानंतर पालिकेने पुन्हा पॅन्सी टॅक्नॉलॉजीला ५ वर्षांसाठी मुदतवाढ दिली होती. पालिका शाळेतून प्रशिक्षण मिळू लागल्याने मुलांना संगणकाबद्दल आवड निर्माण होऊन त्याची हाताळणी, त्याचे प्रोगॅम, होणारे फायदे यांची चांगली माहिती होत होती. विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देण्याच्या कराराची मुदत ३० नोव्हेंबरला संपुष्टात आली. परंतु, पॅन्सी टॅक्नॉलॉजीशी केलेल्या कराराची मुदत संपुष्टात येणार असल्याची पूर्वकल्पना असूनही पालिकेने नव्याने निविदा मागवण्याचा प्रयत्नच केला नाही. वास्तविक, प्रशासनाने मुदत संपायच्या काही महिने आधीपासूनच निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे होती. पण, भोंगळ कारभार व पालिका शाळा तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या अनास्थेचा फटका संगणकाच्या प्रशिक्षणाला बसलाआहे. महिनाभरापासून विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण मिळणे बंद झाले आहे. (प्रतिनिधी)