शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे २० कोटींना आव्हान?

By admin | Updated: February 14, 2017 02:51 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात पालिका अपयशी ठरल्याने बांधकाम बंदीची टांगती तलवार राहू नये, यासाठी महिनाभरातच प्रकल्प

भार्इंदर : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात पालिका अपयशी ठरल्याने बांधकाम बंदीची टांगती तलवार राहू नये, यासाठी महिनाभरातच प्रकल्प सुरू करण्याचे कार्यादेश देण्यासाठी मीरा-भाईंदर पालिकेची धावपळ सुरू आहे. त्याचवेळी एस्क्रो खात्यात दोन आठवड्यांत २० कोटी जमा करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तनच्या डम्पिंग ग्राऊण्डवर टाकल्या जाणाऱ्ऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होत नसल्याचा हा मुद्दा आहे. त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने ३ फेब्रुवारीला आदेश देत पालिकेला महिनाभरात प्रकल्प सुरु करण्याचा कार्यादेश कंत्राटदाराला देण्यास सांगितले होते. त्याची कार्यवाही सुरु केल्याचे घनकचरा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. संभाजीराव पानपट्टे यांनी सांगितले. उत्तनच्या धावगी-डोंगर येथील डम्पिंग ग्राऊण्ड वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्यासाठी पालिकेकडून पुरेशी तयारी झालेली नाही. तो प्रकल्प आवश्यक सरकारी परवानग्यांत अडकला आहे. मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार शहर महापालिकेचे संयुक्त डम्पिंग गाऊण्ड गोखिवरे येथे सुरु करण्यासाठी दोन्ही महापालिकांची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु तो राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांत अडकल्याने अद्याप सुरु करता झालेला नाही. त्यामुळे सध्या सुमारे ३५० टन कचरा धावगी-डोंगर येथे उघड्यावर टाकला जात आहे. त्यातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने हा प्रकल्प इतरत्र हलवण्यासाठी स्थानिकांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली आहे.विशेष बैठकीमुळे हालचालींना वेगसकवार येथे प्रकल्प सुरु करण्यापूर्वी पालिकेने ७० कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्याचे आदेश लवादाने पालिकेला काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्याला पालिकेने उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. पण पुढील सुनावणी लवादापुढेच घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने पुन्हा युक्तीवाद सुरु झाला. ३ फेब्रुवारीच्या सुनावणीत पालिकेला दोन आठवड्यात एस्क्रो खात्यात २० कोटी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने धावगी-डोंगर येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला महिनाभरात कार्यादेश द्यावा; तसे न झाल्यास ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तो प्रकल्प सुरु करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. पालिकेने मे. सौराष्ट्र एन्वायरो प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीची एकमेव निविदा १० फेब्रुवारीला स्थायी समितीपुढे ठेवली होती. त्यात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण पुढे करुन स्थायीने तिला मान्यता दिली नाही. यात अर्थकारण असल्याचे बोलले जात असले, तरी लवादाच्या आदेशानुसार तातडीने कार्यवाही होणे आवश्यक बनल्याने १३ फेब्रुवारीला स्थायीची विशेष बैठक झाली. त्यात प्रस्तावाला मान्यता दिल्याने कंत्राटदराला प्रकल्प सुरु करण्याचा कार्यादेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु २० कोटींची रक्कम जमा करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असून त्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे विधी अधिकारी सई वडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)