शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

पालिकेचे २० कोटींना आव्हान?

By admin | Updated: February 14, 2017 02:51 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात पालिका अपयशी ठरल्याने बांधकाम बंदीची टांगती तलवार राहू नये, यासाठी महिनाभरातच प्रकल्प

भार्इंदर : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात पालिका अपयशी ठरल्याने बांधकाम बंदीची टांगती तलवार राहू नये, यासाठी महिनाभरातच प्रकल्प सुरू करण्याचे कार्यादेश देण्यासाठी मीरा-भाईंदर पालिकेची धावपळ सुरू आहे. त्याचवेळी एस्क्रो खात्यात दोन आठवड्यांत २० कोटी जमा करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तनच्या डम्पिंग ग्राऊण्डवर टाकल्या जाणाऱ्ऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया होत नसल्याचा हा मुद्दा आहे. त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने ३ फेब्रुवारीला आदेश देत पालिकेला महिनाभरात प्रकल्प सुरु करण्याचा कार्यादेश कंत्राटदाराला देण्यास सांगितले होते. त्याची कार्यवाही सुरु केल्याचे घनकचरा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. संभाजीराव पानपट्टे यांनी सांगितले. उत्तनच्या धावगी-डोंगर येथील डम्पिंग ग्राऊण्ड वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्यासाठी पालिकेकडून पुरेशी तयारी झालेली नाही. तो प्रकल्प आवश्यक सरकारी परवानग्यांत अडकला आहे. मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार शहर महापालिकेचे संयुक्त डम्पिंग गाऊण्ड गोखिवरे येथे सुरु करण्यासाठी दोन्ही महापालिकांची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु तो राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांत अडकल्याने अद्याप सुरु करता झालेला नाही. त्यामुळे सध्या सुमारे ३५० टन कचरा धावगी-डोंगर येथे उघड्यावर टाकला जात आहे. त्यातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने हा प्रकल्प इतरत्र हलवण्यासाठी स्थानिकांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली आहे.विशेष बैठकीमुळे हालचालींना वेगसकवार येथे प्रकल्प सुरु करण्यापूर्वी पालिकेने ७० कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्याचे आदेश लवादाने पालिकेला काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्याला पालिकेने उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. पण पुढील सुनावणी लवादापुढेच घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने पुन्हा युक्तीवाद सुरु झाला. ३ फेब्रुवारीच्या सुनावणीत पालिकेला दोन आठवड्यात एस्क्रो खात्यात २० कोटी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने धावगी-डोंगर येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंत्राटदाराला महिनाभरात कार्यादेश द्यावा; तसे न झाल्यास ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तो प्रकल्प सुरु करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. पालिकेने मे. सौराष्ट्र एन्वायरो प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीची एकमेव निविदा १० फेब्रुवारीला स्थायी समितीपुढे ठेवली होती. त्यात तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण पुढे करुन स्थायीने तिला मान्यता दिली नाही. यात अर्थकारण असल्याचे बोलले जात असले, तरी लवादाच्या आदेशानुसार तातडीने कार्यवाही होणे आवश्यक बनल्याने १३ फेब्रुवारीला स्थायीची विशेष बैठक झाली. त्यात प्रस्तावाला मान्यता दिल्याने कंत्राटदराला प्रकल्प सुरु करण्याचा कार्यादेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु २० कोटींची रक्कम जमा करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार असून त्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे विधी अधिकारी सई वडके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)