शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाला मुंडे यांचा दिलासा!

By admin | Updated: May 28, 2017 03:11 IST

तालुक्यातील नढई गावच्या सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी मृत व्यक्तीस निवासाचा दाखला देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांनी

- प्रकाश जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क

मुरबाड : तालुक्यातील नढई गावच्या सरपंच पद्मा रमेश टोहके यांनी मृत व्यक्तीस निवासाचा दाखला देऊन अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कोकण विभागीय आयुक्तांनी त्यांना दोषी धरून तत्काळ पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांविरुद्ध टोहके यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे अपील केले होते. मुंडे यांनी टोहके यांची बाजू ग्राह्य मानून त्यांना दोषमुक्त केले आहे.नढईच्या सरपंच टोहके यांनी टेंभरे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी गौरूबाई केंबारी या मृत महिलेच्या नावाने निवासाचा दाखला दिला होता. गौरूबाई यांचे माहेर नढईचे होते. त्या आपल्या पतीच्या आत्या असल्याचे भासवून हा दाखला देताना दाखल्यावर आपले दीर शिवाजी गोविंद टोहके यांच्या सासूबाई गं.भा.भागीरथीबाई पदू दिनकर (रा.दहिपाडा-सरळगाव) या जिवंत महिलेचा फोटो लावला होता. हा दाखला मुरबाड येथील दुय्यम निबंधक यांच्याकडे ७ आॅक्टोबर २०१३ रोजी हक्कसोड नोंदणीकरिता आला असता नढई गावातील भाऊ बुधाजी टोहके व संतोष नामदेव टोहके या ग्रामस्थांनी त्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्र ार केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंच पद्मा टोहके यांचे सरपंचपद व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. चौकशीत गौरूबाई केंबारी यांचे १८ मे २०१३ रोजी निधन झाले असून मृत्यूसमयी टेंभरे (बुद्रुक)असा कायमचा पत्ता असल्याचा दाखला ग्रामसेवक टेंभरे यांच्याकडून सादर करण्यात आला. तसेच ज्या जिवंत महिलेचा सरपंच टोहके यांनी दाखल्यावर फोटो लावला होता, ती व्यक्ती ही गौरूबाई केंबारी असल्याचेच दाखवण्याकरिता आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, बँकपासबुक, घरपट्टी किंवा मतदारयादीतील नाव व पत्ता असा कोणताही पुरावा सोबत जोडला नव्हता. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावे हक्कसोड दस्तऐवज बनवण्याचा खोटा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र ग्रामपंचायत कलम ३९ (१) नुसार कोकण विभागीय आयुक्तांनी टोहके यांना सरपंचपदावरून दूर करण्याचे तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. अन्याय दूर झाला...- सरपंच टोहके यांनी दिलेल्या दाखल्यात काही गैर नाही, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. - हा सर्व प्रकार केवळ मला बदनाम करण्याचे षड्यंत्र होते. मात्र, मला अखेर न्याय मिळाला, असे मत नढईचे सरपंच पद्मा टोहके व्यक्त केले.