शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
“आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
4
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
5
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
6
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
7
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
8
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
9
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
11
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
12
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
13
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
14
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
15
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
16
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
17
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
18
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
19
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
20
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?

मुंब्रा आणि दिव्याला सर्वाधिक फटका

By admin | Updated: May 6, 2017 05:57 IST

उन्हाचा कडाका वाढू लागला असतानाच शहरात विजेचा लपंडावदेखील सुरू झाला आहे. ऐन गर्मीत वीज जाण्याचे प्रमाण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उन्हाचा कडाका वाढू लागला असतानाच शहरात विजेचा लपंडावदेखील सुरू झाला आहे. ऐन गर्मीत वीज जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने ठाणेकर हैराण झाले आहेत. विशेषकरून ठाण्याच्या पलीकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा पट्ट्यामध्ये अघोषित भारनियमन सुरू झाले असून ज्या ठिकाणी महावितरणची मोठी थकबाकी आहे, अशा भागात वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, केवळ कळवा, मुंब्राच नव्हे तर नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या घोडबंदर पट्ट्यातील उच्चभ्रू वस्तीमध्येदेखील विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणने मात्र मागणी वाढल्याने तांत्रिक स्वरूपाचे लोडशेडिंग असल्याचे स्पष्ट केले आहे. उन्हाच्या चढत्या पाऱ्याने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे ठाणेकरांना अघोषित लोडशेडिंगला सामोरे जावे लागत आहे. महावितरणने कोणत्याही स्वरूपाची औपचारिक लोडशेडिंगची घोषणा केलेली नाही. मात्र, ठाण्यात अनेक ठिकाणी वीज जाण्याचे प्रमाण गेल्या ५ ते ६ दिवसांत अचानक वाढले आहे. विशेषकरून कळवा, मुंब्रा, दिवा आणि जुने ठाणे अशा ठिकाणी अचानकपणे खंडित होणाऱ्या वीजप्रवाहामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. ठाणे सर्कलअंतर्गत ठाणे १, २, ३, वागळे, भांडुप आणि मुलुंड असे सहा भाग येतात. सध्या उन्हाळ्यामध्ये ६१० मेगावॅट विजेची मागणी असून ती पुरवण्यात येत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याचेच वीज जाण्याच्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. तांत्रिक बिघाडामुळे ऐन उन्हाळ्यात कळवा-खारेगाववासीयांना गुरु वारी तब्बल आठ तास विजेविना राहावे लागले. सकाळपासून दिवसभर वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. कळवा-मुंब्य्राची थकबाकी १५० कोटीथकबाकीदारांसाठी महावितरणच्या वतीने नवप्रकाश योजना सुरू केली होती. संपूर्ण ठाणे सर्कलमध्ये ३०० कोटींची थकबाकी असून एकट्या कळवा-मुंब्य्राची थकबाकी १५० कोटींच्या घरात आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांत केवळ १ ते २ कोटींचीच वसुली झाली आहे. विशेषकरून याच परिसरात वीज जाण्याचे प्रमाण जास्त आहे. येथे थकबाकी असली, तरी यामध्ये वीज जाण्याचा काहीही संबंध नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. लोडशेडिंग केलेले नाही. काही परिसर वगळता महावितरणची वसुली चांगली असून अशा ग्राहकांना नियमित वीजपुरवठा करणे वितरणचे कर्तव्य आहे. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने वीज जात आहे.