शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मुंबईचे पाणी ठाण्याला

By admin | Updated: March 20, 2016 00:56 IST

भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले

ठाणे : भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले आहे आणि त्याबदल्यात ठाण्याच्या वाट्याचे टेमघरचे पाणी कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला देत पाणीवाटपाचे फेरनियोजन केले आहे. यामुळे मुंबईला फारसा फटका बसणार नसला तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला थोडे जादा पाणी देत दिलासा दिला आहे.ठाणे महापालिकेला भातसा धरणातून लागू केलेली ३० टक्के पाणीकपात मुख्यमंत्र्यांनी अवघी पाच टक्के केली आहे. यामुळे ठाण्याला आता भातसातून १४० ऐवजी १५० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या बदल्यात ठाण्याला मिळणारे टेमघरचे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर महापालिकांना वळवण्यात आले आहे.भातसातून ठाणे महापालिकेला २०० एमएलडी पाणी मिळत असे. यातून मुंबई महापालिकेने ३० टक्के कपात लागू केली होती. ती केवळ पाच टक्के होणार आहे. उरलेले २५ टक्के पाणी पुन्हा ठाण्याला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यामुळे ठाणेकरांना आता भातसातून रोज १० एमएलडी जादा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यात ठाण्याला टेमघरकडून मिळणारे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर यांना समान वाटण्याचा निर्णय घेतल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सुभाष वाघमारे यांनी सांगितले. प्रक्षोभ शमवण्यासाठी उचलली पावलेपाणीकपातीमुळे ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात प्रक्षोभ आहे. त्यावर तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही महत्त्वाच्या आमदारांची बैठक घेऊन पाणीकपात कमी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौरांनी सर्वाधिक पाणी आपल्या शहराकडे वळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.