शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मुंबईचे पाणी ठाण्याला

By admin | Updated: March 20, 2016 00:56 IST

भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले

ठाणे : भातसा धरणातून ठाण्यासाठी लागू केलेली कपात कमी करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला दिलासा देत मुंबईच्या वाट्याचे थोडे पाणी ठाण्याकडे वळवले आहे आणि त्याबदल्यात ठाण्याच्या वाट्याचे टेमघरचे पाणी कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला देत पाणीवाटपाचे फेरनियोजन केले आहे. यामुळे मुंबईला फारसा फटका बसणार नसला तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदरला थोडे जादा पाणी देत दिलासा दिला आहे.ठाणे महापालिकेला भातसा धरणातून लागू केलेली ३० टक्के पाणीकपात मुख्यमंत्र्यांनी अवघी पाच टक्के केली आहे. यामुळे ठाण्याला आता भातसातून १४० ऐवजी १५० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या बदल्यात ठाण्याला मिळणारे टेमघरचे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर महापालिकांना वळवण्यात आले आहे.भातसातून ठाणे महापालिकेला २०० एमएलडी पाणी मिळत असे. यातून मुंबई महापालिकेने ३० टक्के कपात लागू केली होती. ती केवळ पाच टक्के होणार आहे. उरलेले २५ टक्के पाणी पुन्हा ठाण्याला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यामुळे ठाणेकरांना आता भातसातून रोज १० एमएलडी जादा पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यात ठाण्याला टेमघरकडून मिळणारे ३० एमएलडी पाणी कल्याण-डोंबिवली व मीरा-भार्इंदर यांना समान वाटण्याचा निर्णय घेतल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता सुभाष वाघमारे यांनी सांगितले. प्रक्षोभ शमवण्यासाठी उचलली पावलेपाणीकपातीमुळे ठाणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात प्रक्षोभ आहे. त्यावर तोडग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही महत्त्वाच्या आमदारांची बैठक घेऊन पाणीकपात कमी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौरांनी सर्वाधिक पाणी आपल्या शहराकडे वळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.