शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

धुम्रपानात मुंबईकर देशात दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: May 31, 2017 06:00 IST

तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक

मुरलीधर भवार / लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक मुंबईचा लागतो, अशी माहिती कॅन्सर सर्जन डॉ. अनिल हेरुर यांनी दिली.जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम ‘थ्रेट टू डेव्हलपमेंट’ अशी ठेवली आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. हेरुर यांनी सांगितले की, तंबाखू हा कालसर्प आहे. तो सगळ््याच वयोगटांतील महिला व पुरुषांना गिळंकृत करत आहेत. जगभरात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्येच प्रमाण हे सात कोटी इतके आहे. त्यापैकी एक कोटी लोक भारतात तंबाखू सेवनामुळे मरण पावतात. तंबाखू सेवनामुळे केवळ तंबाखू खाणाऱ्याचाच मृत्यू होत नाही, तर सेकंड हॅण्ड स्मोकिंगमुळे त्याच्या धुराचा त्रास सिगारेट न पिणारा व तंबाखू न खाणाऱ्यास होतो. प्रत्यक्ष सेवन न करताही दुसऱ्याला त्याची झळ पोहचते. दररोज पाच हजार तरुण तंबाखूचे सेवनाला बळी पडतात. जगभरात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या एक अब्ज आहे. त्यापैकी १० टक्के लोक हे भारतीय आहेत. तंबाखू सेवनामुळे केवळ तोंडाचा कर्करोगच होत नाही. तर हृदयाचे, फुफूसाचे आजार, अन्न नलिका, किडनी, मुत्राशयाचा कर्करोग तसेच रक्त वाहिन्याही बाधित होऊ शकतात. तंबाखू सेवनामुळे दाताचे आजार, पचनाची समस्या उद्भवू शकते. भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तंबाखू खातात. या व्यसनाचे प्रमाण त्यांच्यातही झपाट्याने वाढताना दिसत आहे. तंबाखू व तंबाखूयुक्त सिगारेट, गुटख्याने तरुण पिढी तसेच सगळ््याच वयोगटांतील व्यक्तींना विळखा घातला आहे. तंबाखू हा विघातक पदार्थ आहे. तंबाखूचे पीक नगदी असल्याने ते जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होते. तसेच देशाची तरुण पिढी मरणपंथाच्या वाटेला लागते. सरकारला तंबाखू विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असले तरी आरोग्याची भली मोठी किंमत देश व समाजाला मोजावी लागते. तंबाखू केवळ मानवी आरोग्याला पोखरत नसून देशाच्या अर्थ व्यवस्थेला पोखरत आहे.गुटखा सेवनाला शाळकरी मुले बळी पडत आहेत. अत्यंत लहान वयात त्यांना त्याचे व्यसन लागले आहे. एखादी व्यक्ती त्याच्या कुटुंबाचा आधार असते. तरुण व्यक्ती देशाचे भवितव्य आहे. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत उत्पादन घटक असलेली व्यक्ती तंबाखू सेवनामुळे आजाराला बळी पडते. त्यातून तिचा मृत्यू होतो. उत्पादक घटक नष्ट झाल्याने त्याला अप्रत्यक्षरित्या फटका देशाच्या उत्पादकतेला बसतो, याकडे हेरुर यांनी लक्ष वेधले आहे.सरकारने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच आहे. तंबाखूचे सेवन व धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, असा संदेश अनेक चित्रपटांच्या जाहिरातीतून दिला जातो. तसेच सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावरही हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ही बाब चांगली असली तरी त्याचा किती परिणाम साधला जातो. तंबाकूजन्य पदार्थ विकले जाऊ नये, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा नाही. बंदीच्या निर्णयाला अत्यल्प प्रतिसाद आहे. अनेक जण जाहिराती व चित्रपटातील तंबाखू व सिगारेट सेवन पाहून चित्रपटातील नायकाचे अनुकरण करतात. किशोरवयीन मुले त्याचे जास्त अनुकरण करताना दिसतात. तशा प्रकारचे चित्रपटात दाखवले जाऊ नये, याची नैतिक जबाबदारी कलाकारांनी घेतल्यास ते टाळणे शक्य आहे. तंबाखूचे उत्पादन रोखल्यास तंबाखू बाजारात येणार नाही. तसे झाल्याशिवाय समाजाला लागलेली कीड समूळ नष्ट करता येणार नाही, असे डॉ. हेरुर यांनी सांगितले.