शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

धुम्रपानात मुंबईकर देशात दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: May 31, 2017 06:00 IST

तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक

मुरलीधर भवार / लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक मुंबईचा लागतो, अशी माहिती कॅन्सर सर्जन डॉ. अनिल हेरुर यांनी दिली.जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम ‘थ्रेट टू डेव्हलपमेंट’ अशी ठेवली आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. हेरुर यांनी सांगितले की, तंबाखू हा कालसर्प आहे. तो सगळ््याच वयोगटांतील महिला व पुरुषांना गिळंकृत करत आहेत. जगभरात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्येच प्रमाण हे सात कोटी इतके आहे. त्यापैकी एक कोटी लोक भारतात तंबाखू सेवनामुळे मरण पावतात. तंबाखू सेवनामुळे केवळ तंबाखू खाणाऱ्याचाच मृत्यू होत नाही, तर सेकंड हॅण्ड स्मोकिंगमुळे त्याच्या धुराचा त्रास सिगारेट न पिणारा व तंबाखू न खाणाऱ्यास होतो. प्रत्यक्ष सेवन न करताही दुसऱ्याला त्याची झळ पोहचते. दररोज पाच हजार तरुण तंबाखूचे सेवनाला बळी पडतात. जगभरात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या एक अब्ज आहे. त्यापैकी १० टक्के लोक हे भारतीय आहेत. तंबाखू सेवनामुळे केवळ तोंडाचा कर्करोगच होत नाही. तर हृदयाचे, फुफूसाचे आजार, अन्न नलिका, किडनी, मुत्राशयाचा कर्करोग तसेच रक्त वाहिन्याही बाधित होऊ शकतात. तंबाखू सेवनामुळे दाताचे आजार, पचनाची समस्या उद्भवू शकते. भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तंबाखू खातात. या व्यसनाचे प्रमाण त्यांच्यातही झपाट्याने वाढताना दिसत आहे. तंबाखू व तंबाखूयुक्त सिगारेट, गुटख्याने तरुण पिढी तसेच सगळ््याच वयोगटांतील व्यक्तींना विळखा घातला आहे. तंबाखू हा विघातक पदार्थ आहे. तंबाखूचे पीक नगदी असल्याने ते जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होते. तसेच देशाची तरुण पिढी मरणपंथाच्या वाटेला लागते. सरकारला तंबाखू विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असले तरी आरोग्याची भली मोठी किंमत देश व समाजाला मोजावी लागते. तंबाखू केवळ मानवी आरोग्याला पोखरत नसून देशाच्या अर्थ व्यवस्थेला पोखरत आहे.गुटखा सेवनाला शाळकरी मुले बळी पडत आहेत. अत्यंत लहान वयात त्यांना त्याचे व्यसन लागले आहे. एखादी व्यक्ती त्याच्या कुटुंबाचा आधार असते. तरुण व्यक्ती देशाचे भवितव्य आहे. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत उत्पादन घटक असलेली व्यक्ती तंबाखू सेवनामुळे आजाराला बळी पडते. त्यातून तिचा मृत्यू होतो. उत्पादक घटक नष्ट झाल्याने त्याला अप्रत्यक्षरित्या फटका देशाच्या उत्पादकतेला बसतो, याकडे हेरुर यांनी लक्ष वेधले आहे.सरकारने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच आहे. तंबाखूचे सेवन व धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, असा संदेश अनेक चित्रपटांच्या जाहिरातीतून दिला जातो. तसेच सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावरही हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ही बाब चांगली असली तरी त्याचा किती परिणाम साधला जातो. तंबाकूजन्य पदार्थ विकले जाऊ नये, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा नाही. बंदीच्या निर्णयाला अत्यल्प प्रतिसाद आहे. अनेक जण जाहिराती व चित्रपटातील तंबाखू व सिगारेट सेवन पाहून चित्रपटातील नायकाचे अनुकरण करतात. किशोरवयीन मुले त्याचे जास्त अनुकरण करताना दिसतात. तशा प्रकारचे चित्रपटात दाखवले जाऊ नये, याची नैतिक जबाबदारी कलाकारांनी घेतल्यास ते टाळणे शक्य आहे. तंबाखूचे उत्पादन रोखल्यास तंबाखू बाजारात येणार नाही. तसे झाल्याशिवाय समाजाला लागलेली कीड समूळ नष्ट करता येणार नाही, असे डॉ. हेरुर यांनी सांगितले.