शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

धुम्रपानात मुंबईकर देशात दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: May 31, 2017 06:00 IST

तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक

मुरलीधर भवार / लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : तंबाखू सेवनामुळे विकासाला खीळ बसते. धुम्रपानात आपल्या देशात कोलकाता आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांक मुंबईचा लागतो, अशी माहिती कॅन्सर सर्जन डॉ. अनिल हेरुर यांनी दिली.जागतिक तंबाखू विरोधी दिन ३१ मे रोजी पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाची थीम ‘थ्रेट टू डेव्हलपमेंट’ अशी ठेवली आहे. त्यापार्श्वभूमीवर डॉ. हेरुर यांनी सांगितले की, तंबाखू हा कालसर्प आहे. तो सगळ््याच वयोगटांतील महिला व पुरुषांना गिळंकृत करत आहेत. जगभरात तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्येच प्रमाण हे सात कोटी इतके आहे. त्यापैकी एक कोटी लोक भारतात तंबाखू सेवनामुळे मरण पावतात. तंबाखू सेवनामुळे केवळ तंबाखू खाणाऱ्याचाच मृत्यू होत नाही, तर सेकंड हॅण्ड स्मोकिंगमुळे त्याच्या धुराचा त्रास सिगारेट न पिणारा व तंबाखू न खाणाऱ्यास होतो. प्रत्यक्ष सेवन न करताही दुसऱ्याला त्याची झळ पोहचते. दररोज पाच हजार तरुण तंबाखूचे सेवनाला बळी पडतात. जगभरात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या एक अब्ज आहे. त्यापैकी १० टक्के लोक हे भारतीय आहेत. तंबाखू सेवनामुळे केवळ तोंडाचा कर्करोगच होत नाही. तर हृदयाचे, फुफूसाचे आजार, अन्न नलिका, किडनी, मुत्राशयाचा कर्करोग तसेच रक्त वाहिन्याही बाधित होऊ शकतात. तंबाखू सेवनामुळे दाताचे आजार, पचनाची समस्या उद्भवू शकते. भारतात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तंबाखू खातात. या व्यसनाचे प्रमाण त्यांच्यातही झपाट्याने वाढताना दिसत आहे. तंबाखू व तंबाखूयुक्त सिगारेट, गुटख्याने तरुण पिढी तसेच सगळ््याच वयोगटांतील व्यक्तींना विळखा घातला आहे. तंबाखू हा विघातक पदार्थ आहे. तंबाखूचे पीक नगदी असल्याने ते जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान होते. तसेच देशाची तरुण पिढी मरणपंथाच्या वाटेला लागते. सरकारला तंबाखू विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असले तरी आरोग्याची भली मोठी किंमत देश व समाजाला मोजावी लागते. तंबाखू केवळ मानवी आरोग्याला पोखरत नसून देशाच्या अर्थ व्यवस्थेला पोखरत आहे.गुटखा सेवनाला शाळकरी मुले बळी पडत आहेत. अत्यंत लहान वयात त्यांना त्याचे व्यसन लागले आहे. एखादी व्यक्ती त्याच्या कुटुंबाचा आधार असते. तरुण व्यक्ती देशाचे भवितव्य आहे. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेत उत्पादन घटक असलेली व्यक्ती तंबाखू सेवनामुळे आजाराला बळी पडते. त्यातून तिचा मृत्यू होतो. उत्पादक घटक नष्ट झाल्याने त्याला अप्रत्यक्षरित्या फटका देशाच्या उत्पादकतेला बसतो, याकडे हेरुर यांनी लक्ष वेधले आहे.सरकारने गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच आहे. तंबाखूचे सेवन व धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे, असा संदेश अनेक चित्रपटांच्या जाहिरातीतून दिला जातो. तसेच सिगारेट व तंबाखूच्या पाकिटावरही हा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ही बाब चांगली असली तरी त्याचा किती परिणाम साधला जातो. तंबाकूजन्य पदार्थ विकले जाऊ नये, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा नाही. बंदीच्या निर्णयाला अत्यल्प प्रतिसाद आहे. अनेक जण जाहिराती व चित्रपटातील तंबाखू व सिगारेट सेवन पाहून चित्रपटातील नायकाचे अनुकरण करतात. किशोरवयीन मुले त्याचे जास्त अनुकरण करताना दिसतात. तशा प्रकारचे चित्रपटात दाखवले जाऊ नये, याची नैतिक जबाबदारी कलाकारांनी घेतल्यास ते टाळणे शक्य आहे. तंबाखूचे उत्पादन रोखल्यास तंबाखू बाजारात येणार नाही. तसे झाल्याशिवाय समाजाला लागलेली कीड समूळ नष्ट करता येणार नाही, असे डॉ. हेरुर यांनी सांगितले.