शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाणे स्थानकात पाकीटसह मोबाइलचोरीचे प्रमाण घटले, ११५६ घटना कमी झाल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 05:35 IST

ठाणे आरपीएफ आणि जीआरपीची कारवाई आणि रेल्वेस्थानकांवर या दोन्ही पोलीस दलांच्या गस्तीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

ठाणे : लोकल प्रवासात गेल्या वर्षभरात ठाणे स्थानकात पाकीट आणि मोबाइल चोरीच्या तब्बल ३०६६ घटना घडल्या आहेत. मात्र, २०१८ च्या तुलनेत या चोरीच्या घटनांना ब्रेक लागला असून २०१८ च्या तुलनेत या गुन्ह्यांची आकडेवारी २०१९ मध्ये एक हजार १५६ ने कमी झाल्याचा दावा ठाणे रेल्वे पोलीस सुरक्षा बलाने केला आहे. ठाणे आरपीएफ आणि जीआरपीची कारवाई आणि रेल्वेस्थानकांवर या दोन्ही पोलीस दलांच्या गस्तीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.ठाणे रेल्वेस्थानकातून सात ते आठ लाख प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे पोलिसांमार्फत मोबाइल चोरीच्या घटनांचे एफआयआर नोंदवले जाऊ लागल्यामुळे ठाण्यात हे गुन्हे मोठ्याप्रमाणात वाढले. त्यातच मोबाइल आणि पाकीट चोरी अशा दोन्ही गुन्ह्याची संख्या २०१८ मध्ये चार हजार २२२ इतकी नोंदवली गेली होती. हे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी मोबाइल आणि पाकिट चोरीच्या घटनांची सुसाट निघाली लोकल ट्रेन थांबण्यासाठी रेल्वेस्थानकावर गस्तीचे प्रमाण वाढवले. त्यामुळे स्थानकावर खाकी वर्दी दिसू लागली. तसेच फटका पॉन्ईटवर लक्ष केंद्रीत केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरट्यांची चोरीची पद्धत पाहून त्यांच्यावर पोलीस नजर ठेवले जाऊ लागले. तसेच सध्या वेषात पोलीस पथकाचा वावर वाढल्याने या चोरीच्या घटनांना आळा बसला. त्यामुळे २०१९ या वर्षभरात तीन हजार ६६ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. तर २०१८ या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण १ हजार १५६ ने कमी झाल्याची माहिती ठाणे आरपीएफ पोलिसांनी दिली.  मोबाइल आणि पाकीट चोरीच्या घटनांची आकडेवारी निश्चित संख्या कमी झाली आहे. यामध्ये आरपीएफ पोलिसांबरोबर जीआरपी पोलिसांचेही तितकेच श्रेय आहे. हे प्रमाण या वर्षातही वाढणार नाही. याची दोन्ही पोलीस दलांकडून निश्चितच खबरदारी घेतली जाईल.- राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे आरपीएफ. 

टॅग्स :thaneठाणे