शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

ठाण्यातील महानगरांची पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन ...

अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे उघडले आहेत. या तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत ते १००% भरेल असा अंदाज एमआयडीसीने व्यक्त केला आहे

संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर काठोकाठ भरले आहे. बारवी धरण क्षेत्रात जुलै महिनाअखेर झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण ५० टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांपर्यंत भरले होते; मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरू शकले नाही. ते २०२० मध्ये ३१ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे धरण ९८ टक्के भरले असून या धरणातील अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे हे आपोआप उघडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेट नंबर सात, आठ आणि नऊ हे तीन दरवाजे उघडले असून येत्या दोन दिवसांत हे धरण १००% भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या महानगरांना होतो पाणीपुरवठा

बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यावरच ठाणे जिल्ह्याची तहान अवलंबून असते.

----------------------------------------------