शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील महानगरांची पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन ...

अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे उघडले आहेत. या तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत ते १००% भरेल असा अंदाज एमआयडीसीने व्यक्त केला आहे

संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर काठोकाठ भरले आहे. बारवी धरण क्षेत्रात जुलै महिनाअखेर झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण ५० टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांपर्यंत भरले होते; मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरू शकले नाही. ते २०२० मध्ये ३१ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे धरण ९८ टक्के भरले असून या धरणातील अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे हे आपोआप उघडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेट नंबर सात, आठ आणि नऊ हे तीन दरवाजे उघडले असून येत्या दोन दिवसांत हे धरण १००% भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या महानगरांना होतो पाणीपुरवठा

बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यावरच ठाणे जिल्ह्याची तहान अवलंबून असते.

----------------------------------------------