शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोही आमची, पाणीही आमचेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:07 IST

मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात.

मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात. पण मुख्यमंत्री मी, एमएमआरडीएचा अध्यक्ष मी, फायलींवर मंजुरी देणारा मी... मग यांनी कशी काय कामे केली? हा प्रकार म्हणजे आमचं मूल आम्ही त्यांच्या घरी खेळायला पाठवलं आणि ते त्यांचं झालं अशातला प्रकार असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.निवडणुकीत भाजपा विरुध्द तिन्ही पक्ष विरोधात उतरले असले, तरी आम्ही त्यांना पुरुन उरू, असा दावा त्यांनी केला.मीरा-भार्इंदरसाठी दोन वर्षात जितका पैसा दिला तितका पैसा महापालिकेच्या स्थापनेपासून मिळाला नसेल. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ७५ दशलक्ष लीटर पाण्याचे आधी आरक्षण केले. योजना मंजूर करून ती वेळेआधी पूर्ण केली. पण यातून पुरेसे पाणी मिळणार नाही याची माहिती असल्याने दोन हजार कोटींची सूर्या पाणी योजना मंजूर केली. भविष्यात नागरिकांना रोज पाणी मिळणार आहे. पुढील ४० वर्षापर्यंत पाण्याची समस्या राहणार नाही. रस्ते, भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रकल्प आदींसाठी पैसे दिले. आम्ही आधी पैसे दिले, कामे केली आणि मग मते मागायला आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही पोलीस आयुक्तालय, तहसील कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. बेकायदा घरांमध्ये राहणाºयांची घरे अधिकृत करण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारची महाविद्यालये शहरात सुरू करण्यासाठी विशेष मंजुºया देऊ. पालिका रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटीत रुपांतर होण्यासाठी पीपीपी तत्वावर चालवण्यास सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दीड वर्षात मेट्रोचे काम सुरु झाले नाही; तर संन्यास घेईन, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी चव्हाण तुम्हाला नागरिकांनी आधीच सन्यास दिला आहे, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली.‘शिवसेनेचे बारा वाजवू’ : निवडणुकीत मुख्यमंत्री आणि मी मिळून शिवसेना, काँग्रेसचे बारा वाजवून टाकू. आधी काँग्रेसने मला शिकवले, की भाजपाविरुध्द बोला. म्हणून मी भाजपाविरोधात बोलत होतो. आता मोदींनी शिकवले म्हणून मी काँग्रेसविरोधात बोलतो. मोदी यांचे सरकार दलितविरोधी नाही. काँग्रेसवाल्यांनो, कुठेही जा, पण फिरुन नंतर भाजपा व आरपीआयमध्ये या असे जाहीर निमंत्रण रामदास आठवले यांनी दिले. शिवसेना आमच्यासोबत नाही, पण त्यांची गरज नाही. तुम्हाला सोबत घेतले असते, तर आरपीआयला चार तिकीटेसुद्धा मिळाली नसती, अशी टीका आठवले यांनी केली.