शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोही आमची, पाणीही आमचेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:07 IST

मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात.

मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात. पण मुख्यमंत्री मी, एमएमआरडीएचा अध्यक्ष मी, फायलींवर मंजुरी देणारा मी... मग यांनी कशी काय कामे केली? हा प्रकार म्हणजे आमचं मूल आम्ही त्यांच्या घरी खेळायला पाठवलं आणि ते त्यांचं झालं अशातला प्रकार असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.निवडणुकीत भाजपा विरुध्द तिन्ही पक्ष विरोधात उतरले असले, तरी आम्ही त्यांना पुरुन उरू, असा दावा त्यांनी केला.मीरा-भार्इंदरसाठी दोन वर्षात जितका पैसा दिला तितका पैसा महापालिकेच्या स्थापनेपासून मिळाला नसेल. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ७५ दशलक्ष लीटर पाण्याचे आधी आरक्षण केले. योजना मंजूर करून ती वेळेआधी पूर्ण केली. पण यातून पुरेसे पाणी मिळणार नाही याची माहिती असल्याने दोन हजार कोटींची सूर्या पाणी योजना मंजूर केली. भविष्यात नागरिकांना रोज पाणी मिळणार आहे. पुढील ४० वर्षापर्यंत पाण्याची समस्या राहणार नाही. रस्ते, भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रकल्प आदींसाठी पैसे दिले. आम्ही आधी पैसे दिले, कामे केली आणि मग मते मागायला आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही पोलीस आयुक्तालय, तहसील कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. बेकायदा घरांमध्ये राहणाºयांची घरे अधिकृत करण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारची महाविद्यालये शहरात सुरू करण्यासाठी विशेष मंजुºया देऊ. पालिका रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटीत रुपांतर होण्यासाठी पीपीपी तत्वावर चालवण्यास सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दीड वर्षात मेट्रोचे काम सुरु झाले नाही; तर संन्यास घेईन, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी चव्हाण तुम्हाला नागरिकांनी आधीच सन्यास दिला आहे, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली.‘शिवसेनेचे बारा वाजवू’ : निवडणुकीत मुख्यमंत्री आणि मी मिळून शिवसेना, काँग्रेसचे बारा वाजवून टाकू. आधी काँग्रेसने मला शिकवले, की भाजपाविरुध्द बोला. म्हणून मी भाजपाविरोधात बोलत होतो. आता मोदींनी शिकवले म्हणून मी काँग्रेसविरोधात बोलतो. मोदी यांचे सरकार दलितविरोधी नाही. काँग्रेसवाल्यांनो, कुठेही जा, पण फिरुन नंतर भाजपा व आरपीआयमध्ये या असे जाहीर निमंत्रण रामदास आठवले यांनी दिले. शिवसेना आमच्यासोबत नाही, पण त्यांची गरज नाही. तुम्हाला सोबत घेतले असते, तर आरपीआयला चार तिकीटेसुद्धा मिळाली नसती, अशी टीका आठवले यांनी केली.