शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

मेट्रोही आमची, पाणीही आमचेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 03:07 IST

मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात.

मीरा रोड : मीरा- भार्इंदरमध्ये पाणी, मेट्रो आम्ही आणल्याचा दावा शिवसेनेचे नेते करतात. पण मुख्यमंत्री मी, एमएमआरडीएचा अध्यक्ष मी, फायलींवर मंजुरी देणारा मी... मग यांनी कशी काय कामे केली? हा प्रकार म्हणजे आमचं मूल आम्ही त्यांच्या घरी खेळायला पाठवलं आणि ते त्यांचं झालं अशातला प्रकार असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.निवडणुकीत भाजपा विरुध्द तिन्ही पक्ष विरोधात उतरले असले, तरी आम्ही त्यांना पुरुन उरू, असा दावा त्यांनी केला.मीरा-भार्इंदरसाठी दोन वर्षात जितका पैसा दिला तितका पैसा महापालिकेच्या स्थापनेपासून मिळाला नसेल. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी ७५ दशलक्ष लीटर पाण्याचे आधी आरक्षण केले. योजना मंजूर करून ती वेळेआधी पूर्ण केली. पण यातून पुरेसे पाणी मिळणार नाही याची माहिती असल्याने दोन हजार कोटींची सूर्या पाणी योजना मंजूर केली. भविष्यात नागरिकांना रोज पाणी मिळणार आहे. पुढील ४० वर्षापर्यंत पाण्याची समस्या राहणार नाही. रस्ते, भूमिगत गटार योजना, सांडपाणी प्रकल्प आदींसाठी पैसे दिले. आम्ही आधी पैसे दिले, कामे केली आणि मग मते मागायला आलो आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही पोलीस आयुक्तालय, तहसील कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला. बेकायदा घरांमध्ये राहणाºयांची घरे अधिकृत करण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारची महाविद्यालये शहरात सुरू करण्यासाठी विशेष मंजुºया देऊ. पालिका रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटीत रुपांतर होण्यासाठी पीपीपी तत्वावर चालवण्यास सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दीड वर्षात मेट्रोचे काम सुरु झाले नाही; तर संन्यास घेईन, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी चव्हाण तुम्हाला नागरिकांनी आधीच सन्यास दिला आहे, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली.‘शिवसेनेचे बारा वाजवू’ : निवडणुकीत मुख्यमंत्री आणि मी मिळून शिवसेना, काँग्रेसचे बारा वाजवून टाकू. आधी काँग्रेसने मला शिकवले, की भाजपाविरुध्द बोला. म्हणून मी भाजपाविरोधात बोलत होतो. आता मोदींनी शिकवले म्हणून मी काँग्रेसविरोधात बोलतो. मोदी यांचे सरकार दलितविरोधी नाही. काँग्रेसवाल्यांनो, कुठेही जा, पण फिरुन नंतर भाजपा व आरपीआयमध्ये या असे जाहीर निमंत्रण रामदास आठवले यांनी दिले. शिवसेना आमच्यासोबत नाही, पण त्यांची गरज नाही. तुम्हाला सोबत घेतले असते, तर आरपीआयला चार तिकीटेसुद्धा मिळाली नसती, अशी टीका आठवले यांनी केली.