शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

ठाणे : साक्री आगारातील चालकाने आत्महत्या केल्यावर जागे होऊन सरकारने तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित जुलै व ऑगस्ट महिन्याच्या ...

ठाणे : साक्री आगारातील चालकाने आत्महत्या केल्यावर जागे होऊन सरकारने तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित जुलै व ऑगस्ट महिन्याच्या वेतनासाठी पाचशे कोटी मंजूर केले. यामुळे जुलै महिन्याचा पगार ३ सप्टेंबरला संध्याकाळी जमा झाला. परंतु, यासाठी दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. एका आत्महत्येची किंमत ५०० कोटी आहे का? मागील वर्षीच्या ऐन दिवाळीतही तीन महिन्यांचा पगार थकला. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच सरकार जागे होणार आहे का, असा प्रश्न एसटी इंटकचे ठाणे विभागीय सरचिटणीस शाम भोईर यांनी सरकारला विचारला आहे.

याच दरम्यान आंध्र प्रदेश राज्याच्या धर्तीवर राज्य शासनाने एसटी महामंडळ शासनात विलिनीकरण करावे अन्यथा या कामगारांचे गिरणी कामगार व्हायला वेळ लागणार नाही. दोन्ही काँग्रेसने विलिनीकरणाचे वचन आता पाळावे, अशीही यानिमित्ताने आठवण इंटक संघटनेने करून दिली. कर्मचाऱ्यांचे वेतन, डिझेल व इतर खर्च मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून भागवणे एसटीला अशक्य झालेले आहे. सरकारला एसटी वाचवायची असेल तर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण उत्पनाच्या दहापट तिचा तोटा आहे. एसटी ही महाराष्ट्र राज्याची लोकवाहिनी आहे. तिला वाचविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. किती दिवस सरकारच्या निधीवर कर्मचाऱ्यांचा पगार होईल. राज्य सरकारने एसटीची आर्थिक सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे. परंतु, एसटी टिकवायची असेल तर तिचे शासनात विलिनीकरण हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.