शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

संमेलन कंपूशाहीला छेद देणारे असावे

By admin | Updated: October 12, 2016 04:07 IST

मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे

डोंबिवली : मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे साहित्यातील कंपूशाहीला छेद देणारे व्हावे. त्याचे आयोजन हे एक आदर्श ठरावे, अशी अपेक्षा डोंबिवलीतील ज्येष्ठ साहित्यिका लीला शहा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. शहा पुढे म्हणाल्या की, ‘खऱ्या साहित्यिकांना या संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. भव्य आणि दिव्य आयोजनात खऱ्या साहित्यिकाची उपेक्षा होते. त्याला फारसे स्थान दिले जात नाही. काही प्रसंगी तर त्याला साधे कळविण्याची तसदीही घेतली जात नाही. संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी खऱ्या साहित्यिकांना विचारात घ्यावे. त्यांना संमेलनाविषयी काय वाटते, त्यात काय असावे आणि काय असू नये, याचा विचार घ्यावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कमी असावा,’ अशीही सूचना शहा यांनी केली आहे.शहा या डोंबिवलीत ३० वर्षांपासून राहत आहेत. आतापर्यंत विविध विषयांवरील त्यांची ५६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्य सरकारचा उत्कृ ष्ट वाङ्मयाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शहा म्हणाल्या की, अनेक लेखक प्रकाशकांना पैसे देऊन पुस्तके छापतात. मात्र मी कसे कधीच केले नाही. प्रकाशक माझ्याकडे स्वत:हून आले. मानधन देऊन माझे लेखन प्रकाशित केले. मात्र, डोंबिवलीतील काव्य रसिक मंडळाने माझ्या काव्य लेखनाची दखल घेतलेली नाही. माध्यमांनी शहरातील अनेक साहित्यिकांची दखल घेतली आहे. मात्र, माझ्या कामाची दखल घेतली नाही,’ अशी खंत शहा यांनी व्यक्त केली. ५० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शहा सहभागी झाल्या होत्या. तेथेही त्यांची दखल घेतली गेली नाही. मात्र कार्यक्रम संपल्यावर दखल न घेतल्याची जाणीव झाल्याचे आयोजकांनी बोलून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीतील संमेलनात स्थानिक साहित्यिकांची दखल घेतली जावी. त्यांना संमेलनात योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली आहे.