शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

संमेलन कंपूशाहीला छेद देणारे असावे

By admin | Updated: October 12, 2016 04:07 IST

मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे

डोंबिवली : मराठी साहित्य विश्वातही कंपूशाही आहे. साहित्य संमेलनाच्या दरबारी खऱ्या साहित्यिकांना डावलले जाते. ते पुढे येत नाही. डोंबिवलीतील साहित्य संमेलन हे साहित्यातील कंपूशाहीला छेद देणारे व्हावे. त्याचे आयोजन हे एक आदर्श ठरावे, अशी अपेक्षा डोंबिवलीतील ज्येष्ठ साहित्यिका लीला शहा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे. शहा पुढे म्हणाल्या की, ‘खऱ्या साहित्यिकांना या संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. भव्य आणि दिव्य आयोजनात खऱ्या साहित्यिकाची उपेक्षा होते. त्याला फारसे स्थान दिले जात नाही. काही प्रसंगी तर त्याला साधे कळविण्याची तसदीही घेतली जात नाही. संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी खऱ्या साहित्यिकांना विचारात घ्यावे. त्यांना संमेलनाविषयी काय वाटते, त्यात काय असावे आणि काय असू नये, याचा विचार घ्यावा. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कमी असावा,’ अशीही सूचना शहा यांनी केली आहे.शहा या डोंबिवलीत ३० वर्षांपासून राहत आहेत. आतापर्यंत विविध विषयांवरील त्यांची ५६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्य सरकारचा उत्कृ ष्ट वाङ्मयाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच ‘आदर्श डोंबिवलीकर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शहा म्हणाल्या की, अनेक लेखक प्रकाशकांना पैसे देऊन पुस्तके छापतात. मात्र मी कसे कधीच केले नाही. प्रकाशक माझ्याकडे स्वत:हून आले. मानधन देऊन माझे लेखन प्रकाशित केले. मात्र, डोंबिवलीतील काव्य रसिक मंडळाने माझ्या काव्य लेखनाची दखल घेतलेली नाही. माध्यमांनी शहरातील अनेक साहित्यिकांची दखल घेतली आहे. मात्र, माझ्या कामाची दखल घेतली नाही,’ अशी खंत शहा यांनी व्यक्त केली. ५० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शहा सहभागी झाल्या होत्या. तेथेही त्यांची दखल घेतली गेली नाही. मात्र कार्यक्रम संपल्यावर दखल न घेतल्याची जाणीव झाल्याचे आयोजकांनी बोलून दाखविल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवलीतील संमेलनात स्थानिक साहित्यिकांची दखल घेतली जावी. त्यांना संमेलनात योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली आहे.