शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

२७ गावांंबाबत आज मंत्रालयात बैठक

By admin | Updated: December 23, 2016 03:05 IST

केडीएमसीतील २७ गावांतील पाणीप्रश्न असो अथवा रस्तेविकासाची कामे यांसदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक होणार आहे.

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांतील पाणीप्रश्न असो अथवा रस्तेविकासाची कामे यांसदर्भात शुक्रवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता ही बैठक होत आहे. त्याला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, २७ गावांमधील नगरसेवक, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.२७ गावांना अतिरिक्त पाणी देण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन दिले होते. मात्र, ते कागदावरच राहिल्याचा आरोप करीत एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा इशारा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी मध्यंतरी दिला होता. तर अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला होता. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्याप्रकरणी काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे. २७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाईमुळे मे महिन्यात या गावांना १७ ते १८ दशलक्ष लिटर पाणी मिळत होते. त्यानंतर चांगला पाऊस होऊनही या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील भाजपा नगरसेवकांनी अलिकडेच महाजन यांची भेट घेत अतिरिक्त ३० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांशी चचेर्नंतर प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लिटर पाणी देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. (प्रतिनिधी)