शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

महापौर काका, सांगा आता आम्ही खेळायला जायचे तरी कुठे?

By admin | Updated: February 13, 2017 05:04 IST

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मैदानांची सद्यस्थिती पाहता यातील बहुतांश मैदानांची देखभालअभावी दुरवस्था आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मैदानांची सद्यस्थिती पाहता यातील बहुतांश मैदानांची देखभालअभावी दुरवस्था आली आहे. या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असल्याने मैदाने असूनही खेळाडूंना सरावासाठी ठाणे किंवा मुंबईची वाट धरावी लागते. यातून महापालिकेच्या मैदान विकास आणि क्रीडा धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याठिकाणी सुरक्षाव्यवस्था नसल्याने मैदानांवर गर्दुल्ले, भिकारी यांना आश्रय मिळालाच आहे. त्याचबरोबर येथे असुविधांच्या गर्तेत मैदानी खेळ खेळणे खेळाडूंना जिकरीचे होऊन बसले असले तरी जुगार खेळणाऱ्यांचे मात्र पत्त्यांचे डाव महापालिकेच्या ‘कृपाशिर्वादा’ने रंगत असल्याचे चित्र सर्रास पाहयला मिळत आहे. कल्याण डोंबिवली शहरात महापालिकेची एकूण १४ मैदाने आहेत. यातील १० कल्याणमध्ये तर उर्वरित ४ मैदाने डोंबिवलीत आहेत. यात प्रामुख्याने कल्याणमधील सुभाष मैदान, वासुदेव बळवंत फडके, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण(मॅक्सी ग्राऊंड), दादासाहेब गायकवाड क्रीडांगण, नानासाहेब धर्माधिकारी क्रीडासंकुल यासह डोंबिवलीतील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, कान्होजी जेधे मैदान (भागशाळा), गावदेवी सोसायटी, नेहरू मैदान यांचा समावेश आहे. कल्याणमधील सुभाष मैदान आणि डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल ही दोन मैदाने मोठी असून याचठिकाणी सर्वाधिक गैरसोयींचा ‘सामना’ खेळाडूंना करावा लागतो. याठिकाणी विकासाच्या नावाने बोंब असल्याने व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेची मालमत्ता असलेल्या या मैदानांना (डोंबिवलीतील क्रीडासंकुल वगळता) साधी सुरक्षा देखील पुरविणे प्रशासनाला जमलेले नाही. त्यामुळे बहुतांश मैदाने ही भिकारी, गर्दुल्ले यांची आश्रयस्थाने झाली आहेत. काही ठिकाणी दारूच्या पाटर्याही झोडल्या जात असून त्यासाठी प्रसंगी क्रिकेटसाठी बनविलेल्या खेळपट्टीचाही वापर केला जातो. अपुरे मनुष्यबळ असल्याने सुरक्षा पुरवू शकत नसल्याचे तुणतुणे सुरक्षा विभागाकडून नेहमीच वाजविले जाते. दरम्यान, कल्याणमधील वासुदेव बळवंत फडके मैदानावर तर महापालिकेने कचऱ्याच्या गाडया उभ्या केल्याने त्याला डम्पिंगचे स्वरूप आले आहे. अडगळीत पडलेले सामान टाकण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून मैदाने वापरली जात आहेत. एवढेच नव्हे तर कुठल्याही मैदानांवर खेळाडूंना पायाभूत व मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. या गैरसोयींसंदर्भात विविध क्रीडा संस्थांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या पत्रांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यापलिकडे ठोस अशी कृती झालेली नाही. विशेष म्हणजे एखाद्या खेळाडूने विक्रम केल्यानंतर त्याची दखल मंत्री, आमदार, खासदार आणि महापालिका पदाधिकारी, अधिकारी घेतात. अशा खेळाडूंचा सत्कार करताना मैदाने विकसित करण्याच्या घोषणाही केल्या जातात. मात्र सत्काराचे दिवस विरल्यानंतर यात कोणतीही सुधारणा होत नाही ही वस्तूस्थिती आहे. कल्याण डोंबिवलीला जशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे तशीच येथे मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडूंचीही काही कमी नाही. अ‍ॅथलॉटिक्स, क्रि केट, फुटबॉल, खो-खो, मल्लखांब, कबड्डी, बॅडमिंटन यासारख्या विविध खेळांमधले खेळाडू राज्य, जिल्हा आणि देशपातळीवर चमकले आहेत.असे असतानाही येथे खेळाडूंना प्रोत्साहनपर व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे म्हणून महापालिकेची १५ ते २० वर्षातील धोरणात्मक दृष्टी ही उदासिन असल्याचे स्पष्ट आहे.