शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोनो, मेट्रो प्रकल्पांचा सजीवसृष्टीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:33 IST

गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल.

ठाणे : गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल. ही सृष्टी वाचवायची असेल तर मोनो, मेट्रो आणि तत्सम प्रकल्प तत्क ाळ थांबवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.रौद्र प्रतिष्ठानच्यावतीने ‘वाढते तापमान आणि शेतकºयांच्या आत्महत्या’ या विषयावर राऊत यांचे व्याख्यान भंडारी समाज हॉल येथे शनिवारी आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षीच्या जूनपासून यावर्षीच्या जूनपर्यंत एका वर्षात पृथ्वीच्या सरासरी तापमानात ०.२४ अंश से. एवढी वाढ झाली आहे. वातावरणातील हा बदल अत्यंत धोकादायक असल्याचे युनोची जागतिक हवामान संघटना, अमेरिकेच्या नासा आणि राष्टÑीय महासागर आणि वातावरण प्रशासन संस्था या तीनही संघटनांनी जाहीर केले आहे. ही तापमानवाढ अशीच राहिल्यास विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतच्या देशात सजीवांना राहणे अशक्य होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली. एकदा वातावरणात गेलेला कार्बन सुमारे एक हजार वर्षे वातावरणात टिकतो व तापमान वाढवतो. भारतात तर साधारणपणे वीज उत्पादनासाठी रोज सुमारे पंधरा लाख टन कोळसा जाळला जातो. या सगळ्या प्रक्रियेत लाखो टन विषारी वायू वातावरणात सोडले जातात. कार्बन उत्सर्जनामुळे निसर्गचक्र बिघडू लागले आहे आणि शेतीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शेतीतून योग्य उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत, ही मोठी खंत आहे. माणूस भरमसाठी शिक्षण घेऊन संशोधनाच्या मागे लागला आहे. मात्र पृथ्वीला बुद्धिमत्तेची गरज नाही. तिला स्वत:चा  इंटेलिजन्स आहे. आपण फक्त साधेपणा आणि शहाणपणा दाखविण्याची आणि जगण्यासाठी नैसर्गिक शेती करण्याची गरज आहे, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आलेख स्लाईड शोद्वारे दाखविला. यावेळी राजन राजे यांच्या हस्ते राऊत दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.