शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

मोनो, मेट्रो प्रकल्पांचा सजीवसृष्टीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:33 IST

गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल.

ठाणे : गेल्या काही वर्षांत औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होतो आहे, मात्र हा विकास प्राणघातक असून, येत्या ५ वर्षांत औद्योगिकीकरण कोसळू लागेल आणि मानवसृष्टीला धोका निर्माण होईल. ही सृष्टी वाचवायची असेल तर मोनो, मेट्रो आणि तत्सम प्रकल्प तत्क ाळ थांबवले पाहिजे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांनी व्यक्त केले.रौद्र प्रतिष्ठानच्यावतीने ‘वाढते तापमान आणि शेतकºयांच्या आत्महत्या’ या विषयावर राऊत यांचे व्याख्यान भंडारी समाज हॉल येथे शनिवारी आयोजिण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षीच्या जूनपासून यावर्षीच्या जूनपर्यंत एका वर्षात पृथ्वीच्या सरासरी तापमानात ०.२४ अंश से. एवढी वाढ झाली आहे. वातावरणातील हा बदल अत्यंत धोकादायक असल्याचे युनोची जागतिक हवामान संघटना, अमेरिकेच्या नासा आणि राष्टÑीय महासागर आणि वातावरण प्रशासन संस्था या तीनही संघटनांनी जाहीर केले आहे. ही तापमानवाढ अशीच राहिल्यास विषुववृत्तापासून ध्रुवांपर्यंतच्या देशात सजीवांना राहणे अशक्य होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली. एकदा वातावरणात गेलेला कार्बन सुमारे एक हजार वर्षे वातावरणात टिकतो व तापमान वाढवतो. भारतात तर साधारणपणे वीज उत्पादनासाठी रोज सुमारे पंधरा लाख टन कोळसा जाळला जातो. या सगळ्या प्रक्रियेत लाखो टन विषारी वायू वातावरणात सोडले जातात. कार्बन उत्सर्जनामुळे निसर्गचक्र बिघडू लागले आहे आणि शेतीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे. शेतीतून योग्य उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत, ही मोठी खंत आहे. माणूस भरमसाठी शिक्षण घेऊन संशोधनाच्या मागे लागला आहे. मात्र पृथ्वीला बुद्धिमत्तेची गरज नाही. तिला स्वत:चा  इंटेलिजन्स आहे. आपण फक्त साधेपणा आणि शहाणपणा दाखविण्याची आणि जगण्यासाठी नैसर्गिक शेती करण्याची गरज आहे, असे मतही राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा आलेख स्लाईड शोद्वारे दाखविला. यावेळी राजन राजे यांच्या हस्ते राऊत दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.