शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मॉल, मल्टीप्लेक्सच्या महागाईला चाप

By admin | Updated: June 4, 2017 05:15 IST

बडे मॉल, मल्टीप्लेक्समध्ये बाहेरून पाणी व खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी करणारा कुठलाही कायदा केलेला नसतानाही ठाणेकरांची अडवणूक केली जाते. त्याचप्रमाणे

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : बडे मॉल, मल्टीप्लेक्समध्ये बाहेरून पाणी व खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी करणारा कुठलाही कायदा केलेला नसतानाही ठाणेकरांची अडवणूक केली जाते. त्याचप्रमाणे विक्रीदरापेक्षा अवाजवी दर आकारण्यात येतात. याबद्दल आता टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याची संधी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी उपलब्ध करून दिली आहे.ठाणे, डोंबिवली, कल्याण येथील मॉल व मल्टीप्लेक्समध्ये कुटुंबासमवेत जाणाऱ्या लोकांना सोबत पाण्याची बाटली नेण्यास किंवा खाद्यपदार्थ नेण्यास अटकाव केला जातो. तेथील सुरक्षाव्यवस्था पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थ प्रवेशद्वारावर काढून घेतात. बाहेरील पाणी अथवा खाद्यपदार्थ घेऊन मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाऊ नये, असा कायदा नसताना केवळ मल्टीप्लेक्समधील ४० रुपयांची पाण्याची बाटली, १०० ते १२५ रुपयांचे पॉपकॉर्न, प्रतिनग ५० ते ७५ रुपये समोसा असे महागडे पदार्थ ग्राहकांच्या गळ्यात बांधण्यासाठी मुजोर मॉल व मल्टीप्लेक्समालकांनी बाहेरील पदार्थांवरील बंदीची मनमानी केली आहे. पाण्याच्या बाटल्या, शीतपेये यावर छापील किंमत असतानाही मॉल व मल्टीप्लेक्समध्ये शीतपेये ८० ते ८५ रुपयांच्या दराने विकली जातात. ही लुटालुट थांबवण्याकरिताच जिल्हाधिकाऱ्यांनी टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. ठाण्यातील अनेक हॉटेलमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. पदार्थांमध्ये भेसळ जाणवते. बाहेरील खाद्यपदार्थास मनाई करणाऱ्यांसह हॉटेल्स किंवा इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी, भेसळीबाबत ग्राहकांना आता १८००२२२३६५ या टोल फ्री क्र मांकावर तक्रार करता येणार आहे. खते व बियाणांसंदर्भात शेतकऱ्यांनादेखील १८००२३३४००० या क्र मांकावर तक्रार करता येणार असल्याचे ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक संरक्षणविषयक आढावा घेण्यात आला. त्या वेळी देशपांडे यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. लवकरच राज्याचे ग्राहक धोरण जाहीर होणार असून संबंधित समितीच्या बैठका अंतिम टप्प्यात असल्याचेही देशपांडे म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, आदी उपस्थित होते.- ग्राहकाने अस्वच्छता, भेसळ करणाऱ्या हॉटेलांबाबत आता टोल फ्री क्रमांकावर तक्रार करणे शक्य आहे. खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी, भेसळीबाबत ग्राहकांना आता १८००२२२३६५ या क्र मांकावर तक्रार करता येणार आहे. खते व बियाणांसंदर्भात तक्रारींसाठी शेतकऱ्यांना हा १८००२३३४००० या क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.बाहेरील खाद्यपदार्थासह पाणी आणण्यास मनाई करणारा कायदा किंवा नियम नाही. यामुळे कुठल्याही मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह आदी ठिकाणी बाहेरून खाद्यपदार्थ आणि पाणी आणण्यास बंदी घालत असतील, तर तत्काळ जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण कार्यालयाकडे तक्रार करा.- अरुण देशपांडे, अध्यक्ष, ग्राहक कल्याण सल्लागार समितीछापील विक्र ीदरापेक्षा जास्त किंमत किंवा अवाजवी दर, चुकीचे वजन यासाठी जिल्ह्यातील वैधमापनशास्त्र कार्यालयात २४ तास हेल्पलाइन सुरू ठेवण्यात येणार आहे. या उपक्र माकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या फसवणुकीविरुद्ध तक्रार करावी.-डॉ. महेंद्र कल्याणकर,जिल्हाधिकारी, ठाणे